शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसीतील ५० टक्के पाणीकपात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 00:47 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कारखानदारांना दिलासा

पनवेल : तळोजा एमआयडीसीतील ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार, एमआयडीसीने पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. या विरोधात एमआयडीसीतील व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने ही कपात रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींपैकी सर्वात मोठ्या वसाहतींपैकी एक असलेल्या तळोजा एमआयडीसीत प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. स्थानिक शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. प्रदूषणामुळे येथील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने कडक पावले उचलत येथील सीईटीपीकडून दहा कोटींपेक्षा जास्तीचा दंड वसूल केला आहे. तसेच एमआयडीसीमधील अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. ६ सप्टेंबर रोजी एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा हवाला देत प्रदूषणासाठी दंड म्हणून ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला.

यापूर्वीही २५ टक्के पाणीकपातीमुळे कारखानदार हवालदिल झाले होते. उद्योजकांच्या संघटना तळोजा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना उद्योजकांच्या संघटनेचे म्हणणे ऐकून सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय