शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

अग्निशमन दलातील ४१९ पदांना मंजुरी

By admin | Updated: May 23, 2016 03:22 IST

महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे मोठी आग लागल्यास ती विझविताना तारेवरची कसरत करावी लागत होती.

नवी मुंबई : महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे मोठी आग लागल्यास ती विझविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. कर्मचारी भरतीला परवानगी मिळावी यासाठी २००७ पासून पालिका शासनाकडे पाठपुरावा करत होती. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच शासनाकडे पाठपुरावा केल्याने ४१९ पदांना मंजुरी मिळाली असल्याने अग्निशमन दल सक्षम होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १ एप्रिल १९९९ मध्ये सिडकोचे अग्निशमन दल महापालिकेकडे हस्तांतर झाले. तेव्हा फक्त ५६ कर्मचारी व अधिकाऱ्यांना मंजुरी होती. १५ वर्षामध्ये शहराची लोकसंख्या १२ लाखपेक्षा जास्त झाली. याशिवाय ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत व दक्षिण नवी मुंबई, तळोजा एमआयडीसीपर्यंत आग लागल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागते. मनुष्यबळ कमी असल्याने मोठी दुर्घटना घडल्यानंतर तारेवरची कसरत करावी लागत होती. कर्मचारी भरतीसाठी २००७ पासून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. शासन मंजुरीच्या अधीन राहून जवळपास ८४ कर्मचाऱ्यांची भरती केल्यामुळे सद्यस्थितीमध्ये १४० कर्मचारी झाले होते. परंतु शहराचा होणारा विकास व कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत होती. अग्निशमन दलाचे उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, यापूर्वीचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला होता. महापालिकेने दोन वर्षांपासून शासनाकडे अग्निशमन दलासाठी विविध संवर्गातील पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव पुन्हा पाठविला होता. सिडकोकडून १५ वर्षांपूर्वी अग्निशमन केंद्र हस्तांतर झाल्यानंतर शहराची झालेली वाढ, सद्यस्थितीमध्ये असलेली अग्निशमन केंद्र व भविष्यात सुरू करण्यात येणारी नवीन केंद्र यांचा तपशील दिला होता. महापालिकेच्या प्रस्तावावर महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागाचे संचालक यांनीही शिफारस केली होती. शहराची गरज लक्षात घेवून शासनाने ४१९ पदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह फायरमन ते लिपिकापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा संबंध आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व विभागांची बैठक घेतली होती. अग्निशमन दलाचा आढावा घेताना अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ शासनस्तरावर स्वत: संपर्क साधून हा प्रस्ताव तत्काळ मंजूर होणे का आवश्यक आहे याचे सादरीकरण केले. यामुळे जवळपास आठ वर्षांपासूनचा हा प्रश्न मार्गी लागला आहे. ठाणे बेलापूर रोडच्या रूंदीकरणानंतर आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा सर्वात मोठा निर्णय आहे.