शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब! राज्यभरातील लिलाव बंद करण्याचा इशारा

By नारायण जाधव | Updated: August 21, 2023 15:02 IST

केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे

नवी मुंबई : कांदा पीक उशिरा येण्याच्या शक्यतेमुळे दरवाढ होणार भीतीने केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. याविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेल्या नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनेक बाजार समित्यात तो बंद झालाही आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांची शिखर समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत.

या संदर्भात आज (सोमवारी) चार वाजता व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. याठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारपेठेचे संचालक अशोक वाळुंज यांनी लोकमतला सांगितले. निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा थेट कांदा निर्यातीवर परिणाम होऊन परदेशात कांद्याची निर्यात कमी होईल, परिणामी राज्यात कांद्याचे दर घसरतील, असा केंद्र सरकारचा होरा आहे. मात्र, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय आततायी असून कोणताही अभ्यास सरकारने केलेला नाही. मुळात राज्यातील बाजार समित्यांत जो कांदा येत आहे, तो अनेक ठिकाणी भिजलेला येत आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना अशोक वाळुंज यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज १२५ ते १३० गाड्या कांदा येत आहे. त्यातील बहुतांश कांदा भिजलेला आहे. जवळपास ८० टक्के कांदा दुय्यम दर्जाचा येत आहे. आता निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा काहीही परिणाम भारतीय बाजार पेठेवर होणार नाही. उलट शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. यामुळेच नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

मुंबईत पाठिंबा पण लिलाव दोन दिवसानंतर होणार बंदमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व्यापारीही या लिलाव बंद आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. यासाठी आम्ही आज संध्याकाळी चार वाजता बैठक बोलावली आहे. मात्र, आमचा लिलाव दोन दिवस उशिराने बंद होईल. कारण आमच्या बाजार पेठेत बटाट्याचे अनेक गाड्या उत्तरप्रदेश-बिहार मधून निघालेल्या आहेत. त्या वाटेत आहेत. त्या मुंबईत आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुंबईतह दोन दिवसानंतर आम्ही कांदा लिलाव बंद करू, असे अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :onionकांदाNavi Mumbaiनवी मुंबई