शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब! राज्यभरातील लिलाव बंद करण्याचा इशारा

By नारायण जाधव | Updated: August 21, 2023 15:02 IST

केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे

नवी मुंबई : कांदा पीक उशिरा येण्याच्या शक्यतेमुळे दरवाढ होणार भीतीने केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. याविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेल्या नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनेक बाजार समित्यात तो बंद झालाही आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांची शिखर समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत.

या संदर्भात आज (सोमवारी) चार वाजता व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. याठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारपेठेचे संचालक अशोक वाळुंज यांनी लोकमतला सांगितले. निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा थेट कांदा निर्यातीवर परिणाम होऊन परदेशात कांद्याची निर्यात कमी होईल, परिणामी राज्यात कांद्याचे दर घसरतील, असा केंद्र सरकारचा होरा आहे. मात्र, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय आततायी असून कोणताही अभ्यास सरकारने केलेला नाही. मुळात राज्यातील बाजार समित्यांत जो कांदा येत आहे, तो अनेक ठिकाणी भिजलेला येत आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना अशोक वाळुंज यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज १२५ ते १३० गाड्या कांदा येत आहे. त्यातील बहुतांश कांदा भिजलेला आहे. जवळपास ८० टक्के कांदा दुय्यम दर्जाचा येत आहे. आता निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा काहीही परिणाम भारतीय बाजार पेठेवर होणार नाही. उलट शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. यामुळेच नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

मुंबईत पाठिंबा पण लिलाव दोन दिवसानंतर होणार बंदमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व्यापारीही या लिलाव बंद आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. यासाठी आम्ही आज संध्याकाळी चार वाजता बैठक बोलावली आहे. मात्र, आमचा लिलाव दोन दिवस उशिराने बंद होईल. कारण आमच्या बाजार पेठेत बटाट्याचे अनेक गाड्या उत्तरप्रदेश-बिहार मधून निघालेल्या आहेत. त्या वाटेत आहेत. त्या मुंबईत आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुंबईतह दोन दिवसानंतर आम्ही कांदा लिलाव बंद करू, असे अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :onionकांदाNavi Mumbaiनवी मुंबई