शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर मार्गावर दोन वर्षांत ३७४ प्रवाशांनी गमावला जीव

By admin | Updated: December 27, 2016 02:56 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. रेल्वे अपघातांमध्ये या २०१५जानेवारी ते २०१६ नोव्हेंबर या दोन वर्षांमध्ये ३७४ प्रवाशांनी जीव गमावला आहे. यामध्ये २२१ प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले तर १८४ प्रवाशांना लोकल डब्यातून तोल जाऊन पडल्याने जीव गमवावा लागला आहे.हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील सानपाडा, बेलापूर, तुर्भे रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचा जीव बचावण्याची दाट शक्यता असते. मात्र रेल्वे यंत्रणेकडे याच तत्परतेचा अभाव असल्याचे दिसून येते. वाढते अपघात पाहता रेल्वे प्रशासनाकडून वाशी रेल्वे स्थानकाजवळ रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बेलापूर ते वाशी तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी असलेला कामगारवर्ग वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्याकरिता रेल्वे रूळ ओलांडणे, सुरक्षा भिंतींवरून उडी मारण्यासारख्या पर्यायाचा वापर करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वेचे रूळ ओलांडणे धोकादायक आहे अशी वारंवार रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा होते, मात्र त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. गेल्या दोन वर्षात लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करताना १५७ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, तर तोल सावरला न गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१५ या वर्षात १०९ प्रवासी रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत तर ७२ प्रवाशांना तोल जाऊन जीव गमवावा लागला. २०१६ मध्ये नोव्हेंबर दरम्यान ११२ प्रवाशांनी रूळ ओलांडताना जीव गमाविला तर ५८ प्रवासी तोल जाऊन पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे पोलिसांकडून जनजागृतीरेल्वे पोलिसांकडून दर महिन्याला सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविल्या जातात. शाळा, महाविद्यालयांत सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी जनजागृती, उपाययोजनांची माहिती देण्यात असून जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहारहार्बर मार्गावरील संरक्षण भिंती खचल्याने अनेकदा रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अनेकदा पाठपुरावा करून स्थानक परिसरातील संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यात आले.प्रवाशांचा बेजबाबदारपणारूळ ओलांडणे अथवा समांतर चालणे हे बेकायदेशीर आहे. मोबाइल फोन, हेडफोन कानाला लावून रूळ ओलांडले जातात. सुरक्षिततेच्या बाबतीत प्रवासी बेजबाबदारपणे वागत असल्यानेही अपघातांमध्ये वाढ होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मुंबईत नवीन गाड्या आल्यात त्यासाठी २५ हजार व्होल्ट्सच्या तारांचे विद्युतीकरण झाले आहे. त्याबाबत रेल्वे सतत धोक्याची सूचना देत असते, तरीही स्टंटबाजी करत टपावर चढून प्रवास केला जातो. यामध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. - अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता रेल्वे प्रशासन कुचकामी ठरते. अपघातग्रस्त व्यक्ती तेथेच जखमी अवस्थेत पडून असते. प्रथमोपचाराची सेवा त्वरित उपलब्ध होत नाही, तसेच रेल्वे कर्मचारी तेथे हजर नसतो. त्यामुळे जखमी प्रवाशाला तत्काळ उपचार मिळत नाहीत. रेल्वेने प्रत्येक स्थानकात उपचार सुविधा व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया नेरुळ येथील प्रवासी अनघा दळवी यांनी व्यक्त केली आहे.रेल्वे पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असून प्रवाशांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. रूळ ओलांडणाऱ्या तरुणांच्या कानात असलेले हेडफोन जीवघेणे ठरू शकते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जात आहेत, मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे.- प्रमोद ढावरे, पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे स्थानक