शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर मार्गावर दोन वर्षांत ३७४ प्रवाशांनी गमावला जीव

By admin | Updated: December 27, 2016 02:56 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. रेल्वे अपघातांमध्ये या २०१५जानेवारी ते २०१६ नोव्हेंबर या दोन वर्षांमध्ये ३७४ प्रवाशांनी जीव गमावला आहे. यामध्ये २२१ प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले तर १८४ प्रवाशांना लोकल डब्यातून तोल जाऊन पडल्याने जीव गमवावा लागला आहे.हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील सानपाडा, बेलापूर, तुर्भे रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचा जीव बचावण्याची दाट शक्यता असते. मात्र रेल्वे यंत्रणेकडे याच तत्परतेचा अभाव असल्याचे दिसून येते. वाढते अपघात पाहता रेल्वे प्रशासनाकडून वाशी रेल्वे स्थानकाजवळ रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बेलापूर ते वाशी तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी असलेला कामगारवर्ग वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्याकरिता रेल्वे रूळ ओलांडणे, सुरक्षा भिंतींवरून उडी मारण्यासारख्या पर्यायाचा वापर करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वेचे रूळ ओलांडणे धोकादायक आहे अशी वारंवार रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा होते, मात्र त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. गेल्या दोन वर्षात लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करताना १५७ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, तर तोल सावरला न गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१५ या वर्षात १०९ प्रवासी रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत तर ७२ प्रवाशांना तोल जाऊन जीव गमवावा लागला. २०१६ मध्ये नोव्हेंबर दरम्यान ११२ प्रवाशांनी रूळ ओलांडताना जीव गमाविला तर ५८ प्रवासी तोल जाऊन पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे पोलिसांकडून जनजागृतीरेल्वे पोलिसांकडून दर महिन्याला सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविल्या जातात. शाळा, महाविद्यालयांत सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी जनजागृती, उपाययोजनांची माहिती देण्यात असून जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहारहार्बर मार्गावरील संरक्षण भिंती खचल्याने अनेकदा रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अनेकदा पाठपुरावा करून स्थानक परिसरातील संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यात आले.प्रवाशांचा बेजबाबदारपणारूळ ओलांडणे अथवा समांतर चालणे हे बेकायदेशीर आहे. मोबाइल फोन, हेडफोन कानाला लावून रूळ ओलांडले जातात. सुरक्षिततेच्या बाबतीत प्रवासी बेजबाबदारपणे वागत असल्यानेही अपघातांमध्ये वाढ होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मुंबईत नवीन गाड्या आल्यात त्यासाठी २५ हजार व्होल्ट्सच्या तारांचे विद्युतीकरण झाले आहे. त्याबाबत रेल्वे सतत धोक्याची सूचना देत असते, तरीही स्टंटबाजी करत टपावर चढून प्रवास केला जातो. यामध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. - अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता रेल्वे प्रशासन कुचकामी ठरते. अपघातग्रस्त व्यक्ती तेथेच जखमी अवस्थेत पडून असते. प्रथमोपचाराची सेवा त्वरित उपलब्ध होत नाही, तसेच रेल्वे कर्मचारी तेथे हजर नसतो. त्यामुळे जखमी प्रवाशाला तत्काळ उपचार मिळत नाहीत. रेल्वेने प्रत्येक स्थानकात उपचार सुविधा व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया नेरुळ येथील प्रवासी अनघा दळवी यांनी व्यक्त केली आहे.रेल्वे पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असून प्रवाशांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. रूळ ओलांडणाऱ्या तरुणांच्या कानात असलेले हेडफोन जीवघेणे ठरू शकते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जात आहेत, मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे.- प्रमोद ढावरे, पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे स्थानक