शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

हार्बर मार्गावर दोन वर्षांत ३७४ प्रवाशांनी गमावला जीव

By admin | Updated: December 27, 2016 02:56 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. रेल्वे अपघातांमध्ये या २०१५जानेवारी ते २०१६ नोव्हेंबर या दोन वर्षांमध्ये ३७४ प्रवाशांनी जीव गमावला आहे. यामध्ये २२१ प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले तर १८४ प्रवाशांना लोकल डब्यातून तोल जाऊन पडल्याने जीव गमवावा लागला आहे.हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील सानपाडा, बेलापूर, तुर्भे रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचा जीव बचावण्याची दाट शक्यता असते. मात्र रेल्वे यंत्रणेकडे याच तत्परतेचा अभाव असल्याचे दिसून येते. वाढते अपघात पाहता रेल्वे प्रशासनाकडून वाशी रेल्वे स्थानकाजवळ रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बेलापूर ते वाशी तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी असलेला कामगारवर्ग वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्याकरिता रेल्वे रूळ ओलांडणे, सुरक्षा भिंतींवरून उडी मारण्यासारख्या पर्यायाचा वापर करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वेचे रूळ ओलांडणे धोकादायक आहे अशी वारंवार रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा होते, मात्र त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. गेल्या दोन वर्षात लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करताना १५७ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, तर तोल सावरला न गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१५ या वर्षात १०९ प्रवासी रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत तर ७२ प्रवाशांना तोल जाऊन जीव गमवावा लागला. २०१६ मध्ये नोव्हेंबर दरम्यान ११२ प्रवाशांनी रूळ ओलांडताना जीव गमाविला तर ५८ प्रवासी तोल जाऊन पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे पोलिसांकडून जनजागृतीरेल्वे पोलिसांकडून दर महिन्याला सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविल्या जातात. शाळा, महाविद्यालयांत सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी जनजागृती, उपाययोजनांची माहिती देण्यात असून जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहारहार्बर मार्गावरील संरक्षण भिंती खचल्याने अनेकदा रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अनेकदा पाठपुरावा करून स्थानक परिसरातील संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यात आले.प्रवाशांचा बेजबाबदारपणारूळ ओलांडणे अथवा समांतर चालणे हे बेकायदेशीर आहे. मोबाइल फोन, हेडफोन कानाला लावून रूळ ओलांडले जातात. सुरक्षिततेच्या बाबतीत प्रवासी बेजबाबदारपणे वागत असल्यानेही अपघातांमध्ये वाढ होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मुंबईत नवीन गाड्या आल्यात त्यासाठी २५ हजार व्होल्ट्सच्या तारांचे विद्युतीकरण झाले आहे. त्याबाबत रेल्वे सतत धोक्याची सूचना देत असते, तरीही स्टंटबाजी करत टपावर चढून प्रवास केला जातो. यामध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. - अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता रेल्वे प्रशासन कुचकामी ठरते. अपघातग्रस्त व्यक्ती तेथेच जखमी अवस्थेत पडून असते. प्रथमोपचाराची सेवा त्वरित उपलब्ध होत नाही, तसेच रेल्वे कर्मचारी तेथे हजर नसतो. त्यामुळे जखमी प्रवाशाला तत्काळ उपचार मिळत नाहीत. रेल्वेने प्रत्येक स्थानकात उपचार सुविधा व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया नेरुळ येथील प्रवासी अनघा दळवी यांनी व्यक्त केली आहे.रेल्वे पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असून प्रवाशांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. रूळ ओलांडणाऱ्या तरुणांच्या कानात असलेले हेडफोन जीवघेणे ठरू शकते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जात आहेत, मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे.- प्रमोद ढावरे, पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे स्थानक