शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हार्बर मार्गावर दोन वर्षांत ३७४ प्रवाशांनी गमावला जीव

By admin | Updated: December 27, 2016 02:56 IST

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई

शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रवासाकरिता रेल्वेचा मार्ग निवडतात. सकाळी तसेच सायंकाळच्या या कार्यालयीन वेळांमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. रेल्वे अपघातांमध्ये या २०१५जानेवारी ते २०१६ नोव्हेंबर या दोन वर्षांमध्ये ३७४ प्रवाशांनी जीव गमावला आहे. यामध्ये २२१ प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले तर १८४ प्रवाशांना लोकल डब्यातून तोल जाऊन पडल्याने जीव गमवावा लागला आहे.हार्बर मार्गावरील नवी मुंबईतील सानपाडा, बेलापूर, तुर्भे रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढविण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचा जीव बचावण्याची दाट शक्यता असते. मात्र रेल्वे यंत्रणेकडे याच तत्परतेचा अभाव असल्याचे दिसून येते. वाढते अपघात पाहता रेल्वे प्रशासनाकडून वाशी रेल्वे स्थानकाजवळ रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बेलापूर ते वाशी तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी असलेला कामगारवर्ग वेळ आणि शारीरिक श्रम वाचविण्याकरिता रेल्वे रूळ ओलांडणे, सुरक्षा भिंतींवरून उडी मारण्यासारख्या पर्यायाचा वापर करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. रेल्वेचे रूळ ओलांडणे धोकादायक आहे अशी वारंवार रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा होते, मात्र त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात. गेल्या दोन वर्षात लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करताना १५७ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, तर तोल सावरला न गेल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१५ या वर्षात १०९ प्रवासी रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत तर ७२ प्रवाशांना तोल जाऊन जीव गमवावा लागला. २०१६ मध्ये नोव्हेंबर दरम्यान ११२ प्रवाशांनी रूळ ओलांडताना जीव गमाविला तर ५८ प्रवासी तोल जाऊन पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे पोलिसांकडून जनजागृतीरेल्वे पोलिसांकडून दर महिन्याला सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविल्या जातात. शाळा, महाविद्यालयांत सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी जनजागृती, उपाययोजनांची माहिती देण्यात असून जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहारहार्बर मार्गावरील संरक्षण भिंती खचल्याने अनेकदा रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अनेकदा पाठपुरावा करून स्थानक परिसरातील संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यात आले.प्रवाशांचा बेजबाबदारपणारूळ ओलांडणे अथवा समांतर चालणे हे बेकायदेशीर आहे. मोबाइल फोन, हेडफोन कानाला लावून रूळ ओलांडले जातात. सुरक्षिततेच्या बाबतीत प्रवासी बेजबाबदारपणे वागत असल्यानेही अपघातांमध्ये वाढ होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मुंबईत नवीन गाड्या आल्यात त्यासाठी २५ हजार व्होल्ट्सच्या तारांचे विद्युतीकरण झाले आहे. त्याबाबत रेल्वे सतत धोक्याची सूचना देत असते, तरीही स्टंटबाजी करत टपावर चढून प्रवास केला जातो. यामध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. - अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता रेल्वे प्रशासन कुचकामी ठरते. अपघातग्रस्त व्यक्ती तेथेच जखमी अवस्थेत पडून असते. प्रथमोपचाराची सेवा त्वरित उपलब्ध होत नाही, तसेच रेल्वे कर्मचारी तेथे हजर नसतो. त्यामुळे जखमी प्रवाशाला तत्काळ उपचार मिळत नाहीत. रेल्वेने प्रत्येक स्थानकात उपचार सुविधा व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया नेरुळ येथील प्रवासी अनघा दळवी यांनी व्यक्त केली आहे.रेल्वे पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असून प्रवाशांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. रूळ ओलांडणाऱ्या तरुणांच्या कानात असलेले हेडफोन जीवघेणे ठरू शकते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जात आहेत, मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे.- प्रमोद ढावरे, पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे स्थानक