शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:00 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही.

- अनंत पाटीलनवी मुंबई - स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही. या नागरिकांना इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागत आहे. वाशी शिधावाटप कार्यालयामधील अपुरा कर्मचारी वर्ग व प्रशासकीय उदासीनतेमुळे १०० टक्के नागरिकांपर्यंत गॅस पुरविण्यात अपयश आले आहे.घणसोली ते बेलापूरपर्यंत शासनमान्य स्वस्त धान्य शिधावाटप दुकानांची एकूण संख्या ९४ असून, त्यापैकी नऊ दुकाने विविध कारणांमुळे निलंबित आहेत. मात्र, उर्वरित ८५ शिधावाटप दुकानांचा कारभार वाशी पोलीस ठाण्यासमोरील वाशी शिधावाटप कार्यालयामार्फत चालतो. या कार्यालयात एकूण १ लाख ४४ हजार ३१९ शिधावाटप कार्डधारकांची संख्या असून, त्यापैकी ३५ हजार कार्डधारकांकडे गॅस सिलिंडर जोडणी नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहरामध्येहीहजारो कुटुंबीयांकडे गॅसजोडणी नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येणाºया कार्डधारकांना दोन रुपये किलो दराने गहू, तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. गॅसजोडणी नसल्यामुळे इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागत आहे. सद्यस्थितीत वाशी कार्यालयांतर्गत येणाºया ८५ दुकानांना दरमहा ७० हजार लीटर रॉकेलचा पुरवठा केला जातो.रॉकेलसाठी बोगस शिधापत्रिका तयार केल्या आहेत का, याची छाननी करण्याची मागणीही केली जात आहे. शिधावाटप कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाहीत. ८५ दुकानांसाठी केवळ आठ निरीक्षक आहेत. शिपाई फक्त एकच असल्यामुळे नागरिकांची कामे होण्यास विलंब होत आहे. आठ निरीक्षकांसाठी किमान आठ संगणकांची गरज आहे, परंतु चार संगणकांवर काम केले जात आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना तासन्तास ताटकळत कधी काम होईल, म्हणून उभे राहावे लागत आहे. गतमहिन्यात शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून प्रत्येक दुकानात २५० किलो तूरडाळ आली होती, परंतु त्याचे योग्य प्रमाणात वितरण झालेले नाही.‘दीड लाख शिधापत्रिकाधारकांची संख्या असलेल्या वाशी ४१ एफ अंतर्गत शिधावाटप कार्यालयात शिपाई, निरीक्षक, लिपिक वाढविणे आवश्यक आहे. शिधापत्रिकाधारकांना विविध कामांसाठी आमच्या वाशी कार्यालयाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाते, पण अपुºया कर्मचारी संख्येमुळे काही वेळा विलंब होतो. हे खरे असले, तरी नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.’- एकनाथ पवार, शिधावाटप नियंत्रक,अधिकारी ४१ फ, वाशी.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरNavi Mumbaiनवी मुंबई