शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतून ३२ किलो गांजा जप्त, तिघांना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:04 IST

अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते.

नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते. हा गांजा ठाण्यात विक्रीसाठी पाठवला जाण्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे.गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २९ व ३० जानेवारी रोजी सलग दोन रात्री कोपरी येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. एक व्यक्ती गांजाची विक्रीसाठी त्याठिकाणी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. या प्रकाराची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली असता, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे यांनी दोन पथक तयार केले होते. एका पथकाचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे तर दुसºया पथकाचे प्रमुख राणी काळे होत्या. या पथकात हवालदार रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, इकबाल शेख, सांगोलकर, कासम पिरजादे, सलीम इनामदार, संजय चौधरी, सचिन भालेराव, राजेश गाढवे, आकाश मुके यांचा समावेश होता.त्यांनी २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील पुनीत टॉवरलगतच्या परिसरात सापळा रचला होता. त्या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाºया दस्तगीर शेख (४५) याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो गांजा आढळला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्या अटकेनंतर मंगळवारी चौकशीदरम्यान त्याने इतर दोन साथीदारांची माहिती दिली. ते दोघे जण मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन त्याला मंगळवारीच भेटणार होते, अशी माहिती देखील त्याने दिली. हा गांजा घेऊन तो ठाण्यामध्ये काही ठिकाणी विक्रीसाठी पुरवणार होता. त्यानुसार बाजारे व काळे यांच्या पथकाने पुन्हा दस्तगीर राहत असलेल्या कोपरी परिसरात सापळा रचला होता. शेखने दिलेल्या माहितीनुसार गांजा घेऊन येणारे साथीदार ठरलेल्या ठिकाणी पदपथावर उभे राहणार होते. यानुसार बाजारे यांचे पथक तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवून असतानाच दोघे संशयित आढळून आले.दत्तात्रेय जाधव (२८) व अंकुश राठोड (२७) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कर्नाटकचे राहणारे असून झडतीमध्ये त्यांच्याकडे ३० किलो ५५० ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानुसार सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत सुमारे ३२ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवरही एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंतची कोठडी मिळाली आहे.जप्त केलेला गांजा ठाण्यात काही ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जाणार होता, अशी कबुली शेखने दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा