शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

३१ माकडे, १४ कबुतरांचा मृत्यू विषारी वायूने नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:39 IST

रसायनी येथील हिंदुस्थान ऑर्गनिक केमिकल लिमिटेडच्या मालकीच्या २० एकर जागेवर वसलेल्या इस्रोच्या प्लांटमध्ये १५ डिसेंबर २०१८ रोजी वायुगळती झाली होती.

पनवेल : रसायनी येथील हिंदुस्थान ऑर्गनिक केमिकल लिमिटेडच्या मालकीच्या २० एकर जागेवर वसलेल्या इस्रोच्या प्लांटमध्ये १५ डिसेंबर २०१८ रोजी वायुगळती झाली होती. त्यात ३१ माकडे व १४ कबुतरांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. यासंदर्भात मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमुने पाठविण्यात आले होते. शुक्रवार, १२ एप्रिल रोजी वनविभागाला या संदर्भात अहवाल प्राप्त झाला असून या पशूपक्ष्यांचा मृत्यू विषारी वायूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.एचओसीएल, बीपीसीएल व इस्रोच्या अधिकारी व मृत्यदेह पुरणाऱ्या जेसीबी चालक अशा आठ जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पनवेल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात संबंधित माकडे व कबुतरांचा मृत्यू ब्रेनहॅमरेजमुळे झाल्याचा अहवाल दिला होता. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जरी वेगळा आला असला तरी विषारी वायू जास्त वेळ शरीरात राहत नसल्याने मृत्यूचे कारण अहवालात स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीच्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट असल्याचे पनवेलचे सहायक वनसंरक्षक नंदकिशोर कुपते यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आठवडाभरात न्यायालयात सर्व पुरावे व वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेला अहवाल सादर करणार असल्याचे कुपते यांनी स्पष्ट केले आहे.आशिया खंडातील एकमेव प्लांटरसायनीमधील इस्रोचा हा प्लाट आशिया खंडातील एकमेव प्लांट आहे. येथे नायट्रोजन आॅक्साइड वायू तयार होतो. सॅटेलाइटसाठी लागणारे इंधन म्हणून याचा उपयोग होतो.असे घडले होते प्रकरणगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल कंपनीत ३१ माकडे व १४ पक्षी गतप्राण झाले. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या माकडांची कंपनीच्या अधिकाºयांनी थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली.लोकमतने हा प्रकार सर्वप्रथम उघड केला. यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांना जाग आली आणि त्यांनी तात्काळ हालचाल करत या घटनेची दखल घेतली.१३ डिसेंबरला कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला. तसेच यामुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले. त्यानंतर कंपनी बंद केली. मृत्यमुखी पडलेल्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांचे मृतदेह जेसीबीच्या मदतीने मोठा खड्डा करून प्लँटमध्येच पुरण्यात आले.