शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

२८ कोटींच्या विकासकामांना विशेष महासभेत मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:48 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव तरतूद; प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील कामे करण्यास प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २८ कोटींच्या कामांना शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये रस्ते, गटारे, समाज मंदिराचे सुशोभीकरण आदींसह विविध कामांचा समावेश आहे.पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण दि. ८ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील गावातील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी वेगवेगळ्या ९२ कामांना महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या चार प्रभागांपैकी अ, ब आणि ड प्रभागामध्ये ही विकासकामे करण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अ मधील रोहिंजण, तुर्भे, धरणा कॅम्प, पापडीचा पाडा, खुटुंकबांधन, खुटारी, एकटपाडा, पडघे, आडिवली, इनामपुरी, तोंडरे, नागझरी, कोपरा, ओवे, पेंधर, धरणा, पेठ, तळोजा घोट, धामोळे आदी गावांमध्ये ६२ कामांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ब मध्ये खिडुकपाडा, वळवली, टेंभोडे, आसुडगाव, कळंबोली, रोडपाली या गावांमध्ये २४ कामांचा समावेश आहे. तर, प्रभाग ड मध्ये सहा कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या विकासकामांवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पालिकेचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जात आहे. हा दुजाभाव थांबणे गरजेचे असल्याचे लीना गरड यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी ही कामे तातडीने करून कामाचा दर्जा चांगला असल्याबाबत सूचना केल्या.यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. 

दुजाभाव थांबणे गरजेचे - लीना गरडविकास हा सर्वांगीण होणे गरजेचे आहे. शहरी भागात विकास कामे होत नसताना, नागरिकांवर मालमत्ता कराचा बोजा दिला दिला जात आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात मालमत्ता कर न वाढवता, पालिकेचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जात आहे. हा दुजाभाव थांबणे गरजेचे असल्याचे सांगत, सत्ताधारी भाजपचा लीना गरड यांनी निषेध व्यक्त करीत भाजपला घरचा आहेर दिला

ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरिताच ही विकासकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. आम्ही या विकासकामांचा दर्जा टिकून राहावा, याकरिता या कामांवर लक्ष ठेवणार आहोत.- परेश ठाकूर, सभागृह नेते