शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

पनवेलमध्ये 274 कुटुंबाचे वास्तव्य अतिधोकदायक इमारतीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 00:02 IST

धोकादायक इमारती मधील रहिवाशांचा जीव टांगणीला.

वैभव गायकर,पनवेल: मुंबई आणि उपनगरात धोकादायक ईमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडतात.दरवर्षी या घटनेत वाढ होत असते मात्र या घटनांना पूर्णविराम मिळत नाही.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील शेकडो धोकादायक ईमारती घोषित केल्या आहेत.विशेष म्हणजे पालिकेने या ईमारती धोकादायक तर घोषित केल्या मात्र आजही या धोकादायक ईमारतीत शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याने भविष्यात याठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे.या वर्गवारीत धोकादायक आणि अतिधोकादायक असे दोन भाग केले असून सर्वाधिक अतिधोकादायक आणि धोकादायक ईमारती पनवेल आणि कळंबोली शहरात आहेत.या 62 अतिधोकादायक ईमारतीत 274 कुटुंब वास्तव्यास आहेत.पनवेल शहरात जीर्ण व धोकादायक ईमारती कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत.पनवेल नगरपरिषदेच्या काळापासून या ईमारती उभ्या आहेत.मध्यंतरी गणेश देशमुख पनवेल महानगरपालिकेचे अयुक्त असताना धोकादायक ईमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली.पालिकेने धोकादायक ईमारतीवर बॅनर लावुन धोकादायक इमारतीच्या आवारात कोणी प्रवेश करू नये असे बॅनर लावले आहेत.मात्र या धोकादायक ईमारती पाडण्यासाठी पालिका प्रशासन पुढे का धजावत नाही.असा प्रश्न निर्माण झाला आहे.अतिधोकादायक ईमारती मध्ये खारघर मध्ये 3,कळंबोली मध्ये 180,कामोठ्यात 21 आणि पनवेल शहरात 70 कुटुंब अतिधोकादायक ईमारतीत वास्तव्यास आहेत.पालिकेने या ईमारतींची यादी जाहीर केली आहे.काही ईमारतींचे पाणी आणि वीज जोडणी देखील बंद करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय हस्तक्षेप ? -पालिकेने धोकादायक म्हणुन घोषित केलेल्या ईमारतींची वीज,पाणी बंद केल्यावर काही रहिवासी राजकीय नेत्यांचा वजन वापरून वीज पाणी पूर्ववत करत आहेत.अशा ईमारतीत दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? अशाप्रकारे राजकीय हस्तक्षेप कितपत योग्य आहे.असा प्रश्न निर्माण झाला आहे. धोकादायक ईमारती पाडणार कोण ?-धोकादायक घोषित केलेल्या अनेक ईमारती रिकाम्या देखील झाल्या आहेत.या ईमारती पडण्याची वाट बघायची कि पालिका या ईमारती स्वतः पाडेल असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. धोकादायक ईमारतींची यादी जाहीर केली आहे.या ईमारती मधील घरे रिकामी करण्याचे अवाहन देखील रहिवाशांना केले आहे.तसेच या ईमारती मधील वीज पाणी जोडणी बंद करण्यास सुरुवात केली आहे.- मारुती गायकवाड (उपायुक्त्त,पनवेल महानगरपालिका )

टॅग्स :panvelपनवेल