शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे महायुतीच्या विरोधात करणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 23:46 IST

संघर्ष समितीचा निर्णय. मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात सभा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेली २७ गावे वेगळी करून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, ते पाळले नसल्याने महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे.

संघर्ष समितीची जाहीर सभा रविवारी मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली. या सभेला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पदाधिकारी अर्जुन चौधरी, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत अध्यक्ष शेलार यांनी समितीच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय ग्रामस्थांच्या सभेत जाहीर केला.

२७ गावे महापालिकेतून वेगळे करण्याचे आश्वासन आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतरही त्यांनी वारंवार या आश्वासनाचा उच्चार केला. मात्र, त्याची पूर्तता आजपर्यंत केलेली नाही. २७ गावांना केवळ झुलवत ठेवले. यापूर्वी महापालिका निवडणुकीवर समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा बहिष्कार मोडीत काढण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उमेदवार त्यांनी उभे केल्याने समितीला बहिष्काराचा पवित्रा मागे घ्यावा लागला.

शिवसेना-भाजपाच्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी २७ गावांच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला २७ गावे मतदान करणार नाहीत. त्याऐवजी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.

शेलार यांनी सांगितले, ‘भाल, भोपर आणि शीळ येथे डम्पिंग ग्राउंडचे आरक्षण आहे. सरकारने ते हटवले नाही. २७ गावांत अन्य भागांतील कचरा आणून २७ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा घाट सरकारने घातला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली, त्यापूर्वी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या राजवटीत जो मालमत्ताकर होता, तो नगण्य होता. आता महापालिकेने दहापटीने जास्त मालमत्ताकराची आकारणी केली आहे. कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण सुरू केले आहे. परंतु, या रस्त्यात बाधित असलेल्यांना अद्याप मोबदला दिला नसताना जबरदस्तीने प्रकल्पाचे काम केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची नाराजी आहे.’बिल्डरांच्या फायद्यासाठी ग्रोथ सेंटरराज्य सरकारने बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठी २७ गावांच्या परिसरात कल्याण ग्रोथ सेंटर आणले आहे. त्याला २७ गावांतील नागरिकांचा विरोध आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे. या विविध मुद्यांचा उल्लेख सभेत शेलार यांनी केला.

टॅग्स :maval-pcमावळ