शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे महायुतीच्या विरोधात करणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 23:46 IST

संघर्ष समितीचा निर्णय. मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात सभा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेली २७ गावे वेगळी करून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, ते पाळले नसल्याने महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे.

संघर्ष समितीची जाहीर सभा रविवारी मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली. या सभेला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पदाधिकारी अर्जुन चौधरी, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत अध्यक्ष शेलार यांनी समितीच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय ग्रामस्थांच्या सभेत जाहीर केला.

२७ गावे महापालिकेतून वेगळे करण्याचे आश्वासन आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतरही त्यांनी वारंवार या आश्वासनाचा उच्चार केला. मात्र, त्याची पूर्तता आजपर्यंत केलेली नाही. २७ गावांना केवळ झुलवत ठेवले. यापूर्वी महापालिका निवडणुकीवर समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा बहिष्कार मोडीत काढण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उमेदवार त्यांनी उभे केल्याने समितीला बहिष्काराचा पवित्रा मागे घ्यावा लागला.

शिवसेना-भाजपाच्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी २७ गावांच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला २७ गावे मतदान करणार नाहीत. त्याऐवजी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.

शेलार यांनी सांगितले, ‘भाल, भोपर आणि शीळ येथे डम्पिंग ग्राउंडचे आरक्षण आहे. सरकारने ते हटवले नाही. २७ गावांत अन्य भागांतील कचरा आणून २७ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा घाट सरकारने घातला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली, त्यापूर्वी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या राजवटीत जो मालमत्ताकर होता, तो नगण्य होता. आता महापालिकेने दहापटीने जास्त मालमत्ताकराची आकारणी केली आहे. कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण सुरू केले आहे. परंतु, या रस्त्यात बाधित असलेल्यांना अद्याप मोबदला दिला नसताना जबरदस्तीने प्रकल्पाचे काम केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची नाराजी आहे.’बिल्डरांच्या फायद्यासाठी ग्रोथ सेंटरराज्य सरकारने बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठी २७ गावांच्या परिसरात कल्याण ग्रोथ सेंटर आणले आहे. त्याला २७ गावांतील नागरिकांचा विरोध आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे. या विविध मुद्यांचा उल्लेख सभेत शेलार यांनी केला.

टॅग्स :maval-pcमावळ