शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

महामार्गावरील अपघातांत शेकडोंचे बळी, आठ वर्षांत २५० बळी; हजारो जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 04:24 IST

मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही.

- वैभव गायकरपनवेल - मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही. भूसंपादन प्रक्रियेस होणाऱ्या विलंबामुळे कामात अडथळा येत आहे. रुंदीकरणाचा फटका अनेकांना बसला असून, आठ वर्षांत या मार्गावर २५० हून जास्त जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे माहितीच्या अधिकाराखाली सामाजिक कार्यकर्ते विशाल राजेमहाडिक यांनी केलेल्या अर्जात ही माहिती उघड झाली आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान २६२ जणांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे रुं दीकरण अनेक वर्षे रखडले आहे. भूसंपादन हा मोठा अडथळा ठरला असून, अद्यापही भूसंपादनाचे काम सुरू आहे. तर अनेक ठिकाण भूसंपादित जागेवरील बांधकाम हटविण्यात आलेले नाही.रुंदीकरणाच्या कामासाठी मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी नागमोडी वळणे तयार झाली आहेत. कोकण, गोव्यात जाण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर होत असल्याने कायम वर्दळ असते. त्यातच सततची रस्त्याची कामे, पावसाळ्यातील खड्डे, मार्गावरील अंधार या कारणांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.सरकारी नोंदीनुसार, २०१२ ते २०१८ दरम्यान १२६६ अपघातांत २६२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारोंच्या वर जखमी झाले आहेत. २०१९ मध्ये तीन महिन्यांतच १५ जणांचे महामार्गावरील अपघातात बळी गेले आहे. १९ डिसेंबर २०११ मध्ये सुप्रीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला महामार्ग रु ंदीकरणाचे काम दिले. १६ जून २०१४ रोजी पळस्पे ते इंदापूर पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन होती. मात्र, अद्याप तीन वेळा डेडलाइन हुकली आहे. २०१४ नंतर २०१६ त्यानंतर २०१८ अशी तिसरी डेडलाइन संपूनदेखील अद्याप काम पूर्ण झालेले नाही. २०१९ ही नव्याने डेडलाइन दिल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हेमंत फेगडे यांनी दिलेल्या पत्रानुसार स्पष्ट होत आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ९४२.६९ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात दोन टप्प्यात केल्या जाणाऱ्या या कामाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास खूप विलंब झाला आहे. पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या रुंदीकरणात भूसंपादन सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर सांगतात. यात मोबदला देण्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून जे खरोखरच बाधित आहेत त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. तर ज्यांचे घर बाधित नाही, अशांना लाखोंचा मोबदला देऊ केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.भूसंपादन गोंधळाचा फटकाभूसंपादन प्रक्रि येतील गोंधळामुळे अद्याप महामार्गाचे रु ंदीकरण रखडले आहे. या भूसंपादन प्रक्रियेत मूळ जागेच्या ठिकाणी वेगळीच जागा दाखविण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जागा संपादित करण्यात आली असली तरी मोबदला मिळत नसल्याने अनेक शेतकºयांनी बांधकामे हटविण्यास मनाई केल्याचे प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्गNavi Mumbaiनवी मुंबई