शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांवर अंडरपासचा उतारा! २५ कोटींत बांधणार पाम बीचवर भुयारी मार्ग

By नारायण जाधव | Updated: November 9, 2022 18:57 IST

पाम बीच मार्गाच्या देखण्या रचनेमुळे त्यावरून जाताना सुसाट वाहन चालविण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही.

नवी मुंबई : नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पाम बीच मार्ग हा गेल्या काही दिवसांपासून अपघात मार्ग म्हणूनही ओळखला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील अपघातांची वाढती संख्या पाहता त्यांना आवर घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सानपाडा येथे हलक्या वाहनांसाठी अंडरपास बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा मार्ग पर्यावरण समाघात निर्धारण प्राधिकरणाच्या परवानगीसाठी अडला असून, ती मिळताच लवकरच त्याचे काम सुरू केले जाणार आहे. या कामावर २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पाम बीच मार्गाच्या देखण्या रचनेमुळे त्यावरून जाताना सुसाट वाहन चालविण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही. मात्र, हा मोह अनेदा अपघाताच्या खाईत घेऊन जातो. हे अपघात रोखण्यासाठी सिग्नलची संख्या वाढविणे, रंबलर्स बसविणे, स्पीड रोधक कॅमेरे बसविणे असे उपाय नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलिसांनी अवलंबविले. तसेच गेल्याच महिन्यात वेगमर्यादेवर बंधन घालून ती ताशी ६० वर आणली. परंतु, तरीही वाहने सुसाट धावतच आहेत.

असा असेल अंडरपासअपघातांना आळा घालण्यासाठी सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ आरसीसी बॉक्स टाईप अंडरपास बांधण्यात येणार आहे. हा अंडरपास एकूण ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधण्यात येणार आहे. त्याची उंची साडेचार मीटर तर रुंदी साडेनऊ मीटरची राहणार आहे. तसेच ५०० मीटरचा ॲप्रोच रोड बांधून पाम बीचवरून सानपाड्यात प्रवेश करता येणे सोपे होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळाल्याचे शहर अभियंता संजय देसाई म्हणाले.

ही काळजी घ्यावी लागणारसीआरझेडने उच्च न्यायालयाच्या परवानगीसह मँग्रोव्ह सेलचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे. शिवाय हा परिसर फ्लेमिंगाे झोन असल्याने त्याचा या पक्ष्यांच्या अधिवासासह परिसरातील वनसंपत्तीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यास महापालिकेस सांगितले आहे.

सध्या हा मार्ग पर्यावरण समाघात निर्धारण प्राधिकरणाच्या परवानगीसाठी अडला आहे. नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि शहराचे रहिवासी विजय नाहटा हेच या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. यामुळे लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी व्यक्त केला. ती मिळाल्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.