शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अंदमानमधील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे, महाराष्ट्रातील या वीरांना मिळाला सन्मान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:21 IST

Andaman & Nicobar Islands: आज पराक्रम दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानमधील २१ बेटांचे परमवीरचक्र विजेत्या वीरांच्या नावांनी नामकरण केले. यामध्ये विक्रम बत्रा, अब्दुल हमीद, रामा राघोबा राणे,  ए.बी. तारापोर यांच्या नावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - आज पराक्रम दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानमधील २१ बेटांचे परमवीरचक्र विजेत्या वीरांच्या नावांनी नामकरण केले. यामध्ये विक्रम बत्रा, अब्दुल हमीद, रामा राघोबा राणे,  ए.बी. तारापोर यांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत निवावी असलेली ही बेटे आता या शूरवीरांच्या नावाने ओळखली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला. नेताजी यांच्या १२६ व्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे पोर्ट ब्लेअर येथे दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या परमवीरचक्र विजेत्यांची नावे अंदमानमधील बेटांना दिली आहेत त्यांनी विविध युद्धांमध्ये पराक्रमाची शर्थ केलेली आहे. बेटांना नावं देण्यात आलेल्या परमवीरचक्र विजेत्यांमध्ये सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे,  कंपनी हवालदार मेजर पीरू सिंह, कॅप्टन जी.एस. सलारिया, लेफ्टिनंट कर्नल धान सिंह थापा, सुभेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, सेकंड लेफ्टिनंट अरुण क्षेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल सिंह शेखों, मेजर परमेश्वरम, नायब सुभेदार बना सिंह, मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन करम सिंह, नायक जदुनाथ सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार, सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांचा समावेश आहे. 

या शूर वीरांपैकी  लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांचं महाराष्ट्राशी खास नातं आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता.  त्यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पूना हॉर्सच्या तुकडीने पाकिस्तानचे ६० हून अधिक रणगाडे नष्ट केले होते. मात्र पाकिस्तानी सैन्याबरोबरच्या या घनघोर लढाईत तारापोर यांना वीरमरण आले होते. लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांच्या कुटुंबाला शौर्याचा वारसा होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात गाजवलेल्या कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांच्या पूर्वजांचा विशेष सन्मान केला होता, असे सांगण्यात येते. नंतरच्या काळात त्यांचे पूर्वज हैदराबादमध्ये स्थलांतरित झाले होते.

तर सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांनी १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवला होता. या पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या रामा राघोबा राणे यांनी १९५८ पर्यंत लष्करात सेवा दिली. त्यानंतर ते पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून लष्करात सेवा देत राहिले. १९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती स्वीकारली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMaharashtraमहाराष्ट्र