शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अंदमानमधील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे, महाराष्ट्रातील या वीरांना मिळाला सन्मान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:21 IST

Andaman & Nicobar Islands: आज पराक्रम दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानमधील २१ बेटांचे परमवीरचक्र विजेत्या वीरांच्या नावांनी नामकरण केले. यामध्ये विक्रम बत्रा, अब्दुल हमीद, रामा राघोबा राणे,  ए.बी. तारापोर यांच्या नावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - आज पराक्रम दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानमधील २१ बेटांचे परमवीरचक्र विजेत्या वीरांच्या नावांनी नामकरण केले. यामध्ये विक्रम बत्रा, अब्दुल हमीद, रामा राघोबा राणे,  ए.बी. तारापोर यांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत निवावी असलेली ही बेटे आता या शूरवीरांच्या नावाने ओळखली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला. नेताजी यांच्या १२६ व्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे पोर्ट ब्लेअर येथे दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या परमवीरचक्र विजेत्यांची नावे अंदमानमधील बेटांना दिली आहेत त्यांनी विविध युद्धांमध्ये पराक्रमाची शर्थ केलेली आहे. बेटांना नावं देण्यात आलेल्या परमवीरचक्र विजेत्यांमध्ये सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे,  कंपनी हवालदार मेजर पीरू सिंह, कॅप्टन जी.एस. सलारिया, लेफ्टिनंट कर्नल धान सिंह थापा, सुभेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, सेकंड लेफ्टिनंट अरुण क्षेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल सिंह शेखों, मेजर परमेश्वरम, नायब सुभेदार बना सिंह, मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन करम सिंह, नायक जदुनाथ सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार, सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांचा समावेश आहे. 

या शूर वीरांपैकी  लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांचं महाराष्ट्राशी खास नातं आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता.  त्यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पूना हॉर्सच्या तुकडीने पाकिस्तानचे ६० हून अधिक रणगाडे नष्ट केले होते. मात्र पाकिस्तानी सैन्याबरोबरच्या या घनघोर लढाईत तारापोर यांना वीरमरण आले होते. लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांच्या कुटुंबाला शौर्याचा वारसा होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात गाजवलेल्या कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांच्या पूर्वजांचा विशेष सन्मान केला होता, असे सांगण्यात येते. नंतरच्या काळात त्यांचे पूर्वज हैदराबादमध्ये स्थलांतरित झाले होते.

तर सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांनी १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवला होता. या पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या रामा राघोबा राणे यांनी १९५८ पर्यंत लष्करात सेवा दिली. त्यानंतर ते पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून लष्करात सेवा देत राहिले. १९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती स्वीकारली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMaharashtraमहाराष्ट्र