शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नवी मुंबईकरांना प्रतिमाणसी २०० लीटर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 22:58 IST

निकषापेक्षा मिळते जास्त पाणी; उत्पन्नापेक्षा महापालिकेकडून प्रतिवर्षी २७ कोटी जादा खर्च

- नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती असताना नवी मुंबईकरांना मात्र मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. शासन निकषाप्रमाणे प्रतिमाणसी प्रतिदिन १५० लीटर पाणी मिळणे आवश्यक असताना पालिकाक्षेत्रात २०० लीटर पाणी दिले जात आहे. पाणीबिलाच्या माध्यमातून वर्षाला सरासरी ८० कोटी उत्पन्न होत असून, देखभाल व दुरुस्तीसाठी तब्बल १०८ कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी मोरबे धरण विकत घेतले आहे. बारवी धरणावर बांधलेल्या धरणाची उंची १९४ फूट असून ११२२० फूट लांबी आहे. धरणाने ८७९० चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे. ९७८ हेक्टर जमीन धरणक्षेत्राने व्यापली आहे.पालिकेने ११३० किलोमीटर लांब जलवाहिनीचे जाळे तयार करून एक लाख २० हजार ४९३ घरगुती व ८७४४ व्यावसायिक जोडणी देऊन शहरात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या बहुतांश परिसराला २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीमधील झोपडपट्टी परिसराला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये धरणामध्ये ७१ मीटरपर्यंत जलसाठा असून पाऊस पडला नाही तरी आॅगस्टपर्यंत तो पुरू शकतो. शासनाच्या निकषाप्रमाणे प्रतिमाणसी १५० लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे.राज्यातील अनेक महानगरांना हा निकष पाळणे शक्य होत नाही; परंतु नवी मुंबई महानगरपालिका प्रतिदिन प्रतिमाणसी २०० लीटर पाणी उपलब्ध करून देत आहे. निकषापेक्षा हे प्रमाण ५० लीटरने जास्त आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन शहराला ३९० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा रोज केला जात आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्थान अभियानाच्या मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे पाणीपुरवठा वितरण व्यवस्था ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालविणे आवश्यक आहे. शासनानेही आॅगस्ट २०१० मध्ये पाण्याचे दर ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविली आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा योजनांचा देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्च पाणीबिलांमधून मिळणे आवश्यक आहे; परंतु नवी मुंबईमध्ये १५ वर्षांमध्ये पाणीदर वाढविले नसल्यामुळे उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद बसत नाही.सद्यस्थितीमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल खर्चावर वर्षाला सरासरी १०८ कोटी रुपये खर्च होत आहेत; परंतु पाणीबिलामधून जेमतेम ८० कोटी रुपये उत्पन्न होत आहे. प्रत्येक वर्षी २८ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. देशाचे महालेखाकार, स्थानिक लेखापरीक्षक यांनीही पाणी देयक व योजनांवरील खर्च यांचा ताळमेळ बसणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे. पार्श्वभूमीवर निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी पाणीदराचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका कार्यक्षेत्रामधील पाणीदर कमी आहेत. अनेक वर्षामध्ये त्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. पुढील वर्षासाठीही त्यामध्ये कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. दराविषयी काही गैरसमज पसरले असल्यामुळे पाणीदराविषयीचा प्रस्ताव माहितीस्तव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेला आहे.- डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई