शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

राज्यातील ४०८ शहरे स्मार्ट करण्यासाठी नियोजन विभागाचा १५०० कोटींचा बूस्टर

By नारायण जाधव | Updated: April 1, 2023 15:40 IST

२७ महापालिकांसह ३८१ नगरपालिकांचा समावेश : नियोजन विभागाने घेतला पुढाकार

नवी मुंबई - राज्यातील ४५.२३ परिसराचे नागरीकरण झालेले आहे; मात्र यातील अनेक शहरांत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यातच जिल्हा वार्षिक योजनांत शहरी लाेकसंख्येचे पाहिजे तसे प्राधान्य दिले जात नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी श्वाश्वत विकासासाठी हरित आणि राहण्यायोग्य शहरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शहरांना भरीव मदत करण्याचा निर्णय नगरविकास विभागाप्रमाणेच नियोजन विभागानेही गेल्यावर्षी घेतला होता. आता एक वर्षाने उशिराने का होईना नियोजन विभागाने राज्यातील ४०८ शहरांना १५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे.

यात २७ महापालिकांना एक हजार कोटी, तर ३८१ नगरपालिका/नगरपंचायतींच्या शहरांना ५०० कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे.या निधीतून या शहरांमध्ये रस्ते, दिवाबत्तीसह पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पायाभूत सुविधांची कामे करणे सोपे होणार आहे.जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी यांचा समावेश असलेली समिती त्या-त्या शहरांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना मान्यता देऊन त्यानुसार निधी वितरित करणार आहे.

मान्यतेसाठी या बाबी तपासणारसंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची वित्तीय परिस्थिती, कामाची गरज आणि प्राथमिकता, भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, शहरीकरणाचा दर, दळणवळण साधनांचा विकास, हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांची निर्मिती.

ही १३ कामे करता येणारनियोजन विभागाने दिलेल्या या निधीतून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना ही १३ कामेच करता येणार असून, तीसुद्धा स्वमालकीच्या जागेवर करायची आहेत. यात पाणीपुरवठा व मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, प्रमुख नागरी मार्ग, नाल्यांचा विस्तार, पथदिवे, हायमास्ट बसविणे, पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, समाजमंदिर, सभागृह, व्यापारी संकुल, वाचनालय बांधणे, शौचालये आणि मुताऱ्या बांधणे, मोकळ्या जागेच्या उद्यान, मैदानात रूपांतर करणे, त्यांचा विस्तार करणे, सार्वजनिक मालकीच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे किंवा तिचा विस्तार करणे, बगीचे विकसित करणे, त्यात सुधारणा करणे, स्मशानभूमी विकसित करणे, हरितपट्टे, अमृत वन विकसित करण्यासह इतर नागरी-पायाभूत सुविधा विकसित करता येणार आहेत.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी