शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्यातील ४०८ शहरे स्मार्ट करण्यासाठी नियोजन विभागाचा १५०० कोटींचा बूस्टर

By नारायण जाधव | Updated: April 1, 2023 15:40 IST

२७ महापालिकांसह ३८१ नगरपालिकांचा समावेश : नियोजन विभागाने घेतला पुढाकार

नवी मुंबई - राज्यातील ४५.२३ परिसराचे नागरीकरण झालेले आहे; मात्र यातील अनेक शहरांत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यातच जिल्हा वार्षिक योजनांत शहरी लाेकसंख्येचे पाहिजे तसे प्राधान्य दिले जात नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी श्वाश्वत विकासासाठी हरित आणि राहण्यायोग्य शहरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शहरांना भरीव मदत करण्याचा निर्णय नगरविकास विभागाप्रमाणेच नियोजन विभागानेही गेल्यावर्षी घेतला होता. आता एक वर्षाने उशिराने का होईना नियोजन विभागाने राज्यातील ४०८ शहरांना १५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे.

यात २७ महापालिकांना एक हजार कोटी, तर ३८१ नगरपालिका/नगरपंचायतींच्या शहरांना ५०० कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे.या निधीतून या शहरांमध्ये रस्ते, दिवाबत्तीसह पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पायाभूत सुविधांची कामे करणे सोपे होणार आहे.जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी यांचा समावेश असलेली समिती त्या-त्या शहरांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना मान्यता देऊन त्यानुसार निधी वितरित करणार आहे.

मान्यतेसाठी या बाबी तपासणारसंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची वित्तीय परिस्थिती, कामाची गरज आणि प्राथमिकता, भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, शहरीकरणाचा दर, दळणवळण साधनांचा विकास, हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांची निर्मिती.

ही १३ कामे करता येणारनियोजन विभागाने दिलेल्या या निधीतून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना ही १३ कामेच करता येणार असून, तीसुद्धा स्वमालकीच्या जागेवर करायची आहेत. यात पाणीपुरवठा व मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, प्रमुख नागरी मार्ग, नाल्यांचा विस्तार, पथदिवे, हायमास्ट बसविणे, पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, समाजमंदिर, सभागृह, व्यापारी संकुल, वाचनालय बांधणे, शौचालये आणि मुताऱ्या बांधणे, मोकळ्या जागेच्या उद्यान, मैदानात रूपांतर करणे, त्यांचा विस्तार करणे, सार्वजनिक मालकीच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे किंवा तिचा विस्तार करणे, बगीचे विकसित करणे, त्यात सुधारणा करणे, स्मशानभूमी विकसित करणे, हरितपट्टे, अमृत वन विकसित करण्यासह इतर नागरी-पायाभूत सुविधा विकसित करता येणार आहेत.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी