शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील १५ गावे, ३४ वाड्या टंचाईग्रस्त

By admin | Updated: March 16, 2017 03:12 IST

पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती

मयूर तांबडे, पनवेलपंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १५ गावे तर३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.मार्च महिना उजाडून १५ दिवस उलटले आहेत त्यामुळे उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे काही प्रमाणात सद्यस्थितीत पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये १५ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी मार्च महिन्यापासूनच पायपीट करावी लागत आहेत. ३१ मार्चअखेर इतकी बिकट अवस्था असेल, तर त्यापुढील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. टंचाई कृती आराखड्यात संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीने टंचाईग्रस्त गावांची उपाययोजनांसाठी वर्गवारी करण्यात आली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ८ गावे आणि १४ वाड्यांचा अशा २२ गाव-वाड्यांचा कृती आराखडा पाठविण्यात आला आहे. या कृती आराखड्यानुसार गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे व एक खासगी विहीर करण्यात येणार आहे. २०१७ च्या उन्हाळ्यात पनवेल तालुक्यातील १५ गावे, ३४ वाड्या असे एकूण ५२ नवीन विंधण विहिरी घेण्यासाठी २६ लाख व पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी एकूण पाच टँकर व खासगी बोअरवेल (वीजपंप) लागणार असून त्यासाठी २३ लाख असा एकूण ४९ लाख इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.मार्च अखेरपर्यंत तालुक्यातील काही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे असे येथील प्रशासनाचे मत आहे. असा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात शासकीय यंत्रणेकडून पाणी पुरवठा होऊ शकेल, परंतु त्यासाठी लागणारे पाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारे टँकर उपलब्ध होणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा पनवेल पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये ८ गावे, त्याखालील १४ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.