शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

महापालिकेच्या तिजोरीमध्ये पडणार २१०० कोटींची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:19 IST

१ डिसेंबरपासून अंमलबजावणी : चार महिन्यांत दोन टप्प्यात अभय योजना लागू

नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ताधारकांसाठीच्या अभय योजनेची १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. चार महिन्यांमध्ये दोन टप्प्यात ही योजना राबविली जाणार असून त्यामुळे २१०० कोटी थकबाकी वसूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा मोठा आहे. प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये या विभागाला उत्पन्नाचे वाढीव उद्दिष्ट देण्यात येते. मालमत्ता कराचा भरणा केला नाही तर प्रशासन नियमाप्रमाणे दंड व व्याज आकारत असते.

एमआयडीसीमधील उद्योजक व इतर अनेक मालमत्ताधारकांना विविध कारणांमुळे कर भरता आला नाही. यामुळे दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत गेली असून ती भरणे अशक्य होऊ लागली होती. या थकबाकीचे प्रमाण तब्बल २१०० कोटी रुपयांवर गेले होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभय योजना लागू करण्याची मागणी शहरवासीयांनी केली होती. महापालिका प्रशासनाने २७ फेब्रुवारी २०१९ च्या सर्वसाधारण सभेमध्ये अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव १४ मे रोजी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. महापौर जयवंत सुतार व आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी वारंवार पाठपूरावा केला होता. शासनाने १३ सप्टेंबरला अद्यादेश काढून अभय योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे काम तत्काळ सुरू केले होते. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर १ डिसेंबरपासून अभय योजना प्रत्यक्ष लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.पहिला टप्पा १ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये मूळ मालमत्ता कर व २५ टक्के दंडाची रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के दंड कमी केला जाणार आहे. दुसरा टप्पा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च असणार आहे. या कलावधीमध्ये दंडात्मक रकमेतून ६२.५० टक्के सूट दिली जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारक आहेत. त्यामध्ये ६८ हजार ६३३ गावठाण, १५ हजार ८०१ विस्तारित गावठाण, ५८ हजार ९९१ सिडको विकसित नोडमधील मालमत्ताधारक आहेत. अनेक ठिकाणी सीआरझेड नियमावलीमुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. मालमत्तांचा कर संबंधितांना वेळेत भरता आला नसल्याने त्यांच्यावरील व्याजाची रक्कम वाढत गेली. सर्व थकबाकीदारांना अभय योजनेमुळे दिलासा मिळणार आहे. अभय योजनेमध्ये मूळ रकमेमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिका क्षेत्रासाठी पुन्हा अभय योजना लागू केली जाणार नाही. यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.आॅनलाइन सुविधाही उपलब्धमालमत्ताधारकांना अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळासह एनएमएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवरही याविषयी लिंक प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर आॅनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएसद्वारे कर भरणा करता येणार आहे.सर्व केंद्रांवर अर्ज उपलब्धया योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्ळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय पालिकेच्या आठ विभाग कार्यालयांसह सर्व संलग्न केंद्रांवर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विभाग कार्यालय व संलग्न केंद्रांवर रोख रक्कम व धनादेशाद्वारेही करस्विकारण्यात येणार आहे.मूळ करात सवलत नाहीच्अभय योजनेमध्ये मूळ कर सर्व मालमत्ताधारकांना भरावा लागणार आहे. कराशिवाय शास्ती व व्याजामध्ये सूट दिली जाणार आहे.च्अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रकमांना अभय योजना लागू होणार नाही.च्अभय योजना लागू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी अभय योजनेअंतर्गत दावा करता येणार नाही. चार महिन्यांनंतर पुन्हा अभय योजना लागू केली जाणार नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई