शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला केंद्राकडून दोन योजनांचा शून्य निधी, मंत्र्यांच्या लोकसभेतील लेखी उत्तरातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:52 IST

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या बाल संरक्षण सेवा योजना व ग्रामविकास खात्याच्या वार्षिक कृती योजना या दोन्ही योजनांमधून महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक रुपयांचाही निधी मिळाला नसल्याचे लोकसभेत केंद्रीय मंत्र्यानी दिलेल्या लेखी उत्तरातून उघड झाले आहे.

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती. 

या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या विकासासाठी मिशन वात्सल्य व बाल संरक्षण सेवा योजनेद्वारे निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या योजनेंतर्गत विविध राज्यांना केंद्र सरकारने ४३५ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत एक रुपयाचा निधीही मिळालेला नसल्याचे या लेखी उत्तरातून समोर आले. या योजनेत उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ४८ कोटींचा निधी मिळाला आहे.

तीन वर्षांपासून निधीचा अभावग्रामीण भागात संगणक साक्षरता वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीला किमान एक संगणक देण्याच्या योजनेत महाराष्ट्राला गेल्या तीन वर्षांपासून एक रुपयांचाही निधी मिळालेला नाही. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे व कलाबेन डेलकर यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंग म्हणाले, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतला संगणक देण्याचा प्रस्ताव आहे. वार्षिक कृती योजनेंतर्गत (एएएस) राज्यांना संगणक खरेदीसाठी निधी दिला जात आहे. महाराष्ट्राला २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये एक रुपयाचाही निधी मिळालेला नसल्याचे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांच्या लेखी उत्तरात सांगितले. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र