शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

महाराष्ट्राला केंद्राकडून दोन योजनांचा शून्य निधी, मंत्र्यांच्या लोकसभेतील लेखी उत्तरातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:52 IST

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या बाल संरक्षण सेवा योजना व ग्रामविकास खात्याच्या वार्षिक कृती योजना या दोन्ही योजनांमधून महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक रुपयांचाही निधी मिळाला नसल्याचे लोकसभेत केंद्रीय मंत्र्यानी दिलेल्या लेखी उत्तरातून उघड झाले आहे.

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती. 

या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या विकासासाठी मिशन वात्सल्य व बाल संरक्षण सेवा योजनेद्वारे निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या योजनेंतर्गत विविध राज्यांना केंद्र सरकारने ४३५ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत एक रुपयाचा निधीही मिळालेला नसल्याचे या लेखी उत्तरातून समोर आले. या योजनेत उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ४८ कोटींचा निधी मिळाला आहे.

तीन वर्षांपासून निधीचा अभावग्रामीण भागात संगणक साक्षरता वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीला किमान एक संगणक देण्याच्या योजनेत महाराष्ट्राला गेल्या तीन वर्षांपासून एक रुपयांचाही निधी मिळालेला नाही. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे व कलाबेन डेलकर यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंग म्हणाले, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतला संगणक देण्याचा प्रस्ताव आहे. वार्षिक कृती योजनेंतर्गत (एएएस) राज्यांना संगणक खरेदीसाठी निधी दिला जात आहे. महाराष्ट्राला २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये एक रुपयाचाही निधी मिळालेला नसल्याचे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांच्या लेखी उत्तरात सांगितले. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र