शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

महाराष्ट्राला केंद्राकडून दोन योजनांचा शून्य निधी, मंत्र्यांच्या लोकसभेतील लेखी उत्तरातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:52 IST

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या बाल संरक्षण सेवा योजना व ग्रामविकास खात्याच्या वार्षिक कृती योजना या दोन्ही योजनांमधून महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षात एक रुपयांचाही निधी मिळाला नसल्याचे लोकसभेत केंद्रीय मंत्र्यानी दिलेल्या लेखी उत्तरातून उघड झाले आहे.

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती. 

या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या विकासासाठी मिशन वात्सल्य व बाल संरक्षण सेवा योजनेद्वारे निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या योजनेंतर्गत विविध राज्यांना केंद्र सरकारने ४३५ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्राला २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत एक रुपयाचा निधीही मिळालेला नसल्याचे या लेखी उत्तरातून समोर आले. या योजनेत उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ४८ कोटींचा निधी मिळाला आहे.

तीन वर्षांपासून निधीचा अभावग्रामीण भागात संगणक साक्षरता वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीला किमान एक संगणक देण्याच्या योजनेत महाराष्ट्राला गेल्या तीन वर्षांपासून एक रुपयांचाही निधी मिळालेला नाही. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे व कलाबेन डेलकर यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंग म्हणाले, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतला संगणक देण्याचा प्रस्ताव आहे. वार्षिक कृती योजनेंतर्गत (एएएस) राज्यांना संगणक खरेदीसाठी निधी दिला जात आहे. महाराष्ट्राला २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये एक रुपयाचाही निधी मिळालेला नसल्याचे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांच्या लेखी उत्तरात सांगितले. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र