शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

तरुणाईने नवभारत साकारावा, १८ ते २५ वयोगटाला पंतप्रधानांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:35 IST

देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.‘आकाशवाणी’वरील सरत्या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी खास करून सन २००० किंवा त्यानंतर जन्मलेल्या युवापिढीशी संवाद साधला. २१व्या शतकात जन्मलेले नागरिक येत्या वर्षापासून मतदार होण्यास पात्र ठरतील. त्यामुळे उद्याचा १ जानेवारी माझ्या दृष्टीने खास दिवस आहे, असे सांगून मोदींनी या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करून घेण्याचा आग्रह केला.मोदी म्हणाले की, लोकशाहीत मत ही सर्वात मोठी शक्ती आहे व लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे ते प्रभावी साधन आहे. युवापिढी ऊर्जा आणि संकल्पाने भारलेली आहे व या ऊर्जावान पिढीच्या कौशल्याने व ताकदीनेच नवभारताचे स्वप्न साकार होईल, याबद्दल मला खात्री आहे. हा नवभारत जातीयवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या विषांपासून मुक्त असावा. तेथे अस्वच्छता व गरिबीला मुळीच स्थान नसावे व त्यात सर्वांना आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची समान संधी मिळावी. शांतता, एकता व सद्भावना हेच अशा नवभारताचे सूत्र असावे.जनआंदोलनउभे राहावेतरुण पिढीने केवळ नवभारताचे स्वप्नरंजन न करता, त्यासाठी पुढाकार घेऊन विचारमंथन करावे, असे आवाहन करून, मोदी यांनी १८ ते २५ वर्षांच्या युवक-युवतींनी प्रत्येक जिल्ह्यात अभिरूप संसद भरवून यावर चर्चा करावी. प्रत्येक जिल्ह्यातील एक युवा प्रतिनिधी घेऊन, १५ आॅगस्टच्या सुमारास देशपातळीवरील अशा अभिरूप संसदेचे आयोजन दिल्लीतही केले जाऊ शकेल, असेही त्यांनी सुचविले. स्वातंत्र्यासाठी जसे जन आंदोलन उभे राहिले, तसे या विचारमंथनातून विकासाचे, प्रगतीचे, सामर्थ्यवान-शक्तिशाली भारताचे जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधीनरेंद्र मोदी सरकार हे फक्त पोकळ घोषणा देणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवून, स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या ९,८६० कोटी रुपयांपैकी केवळ ७ टक्के निधीच सरकारने खर्च केला आहे, असे रविवारी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत