शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

तरुणाईने नवभारत साकारावा, १८ ते २५ वयोगटाला पंतप्रधानांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:35 IST

देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.‘आकाशवाणी’वरील सरत्या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी खास करून सन २००० किंवा त्यानंतर जन्मलेल्या युवापिढीशी संवाद साधला. २१व्या शतकात जन्मलेले नागरिक येत्या वर्षापासून मतदार होण्यास पात्र ठरतील. त्यामुळे उद्याचा १ जानेवारी माझ्या दृष्टीने खास दिवस आहे, असे सांगून मोदींनी या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करून घेण्याचा आग्रह केला.मोदी म्हणाले की, लोकशाहीत मत ही सर्वात मोठी शक्ती आहे व लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे ते प्रभावी साधन आहे. युवापिढी ऊर्जा आणि संकल्पाने भारलेली आहे व या ऊर्जावान पिढीच्या कौशल्याने व ताकदीनेच नवभारताचे स्वप्न साकार होईल, याबद्दल मला खात्री आहे. हा नवभारत जातीयवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या विषांपासून मुक्त असावा. तेथे अस्वच्छता व गरिबीला मुळीच स्थान नसावे व त्यात सर्वांना आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची समान संधी मिळावी. शांतता, एकता व सद्भावना हेच अशा नवभारताचे सूत्र असावे.जनआंदोलनउभे राहावेतरुण पिढीने केवळ नवभारताचे स्वप्नरंजन न करता, त्यासाठी पुढाकार घेऊन विचारमंथन करावे, असे आवाहन करून, मोदी यांनी १८ ते २५ वर्षांच्या युवक-युवतींनी प्रत्येक जिल्ह्यात अभिरूप संसद भरवून यावर चर्चा करावी. प्रत्येक जिल्ह्यातील एक युवा प्रतिनिधी घेऊन, १५ आॅगस्टच्या सुमारास देशपातळीवरील अशा अभिरूप संसदेचे आयोजन दिल्लीतही केले जाऊ शकेल, असेही त्यांनी सुचविले. स्वातंत्र्यासाठी जसे जन आंदोलन उभे राहिले, तसे या विचारमंथनातून विकासाचे, प्रगतीचे, सामर्थ्यवान-शक्तिशाली भारताचे जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधीनरेंद्र मोदी सरकार हे फक्त पोकळ घोषणा देणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवून, स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या ९,८६० कोटी रुपयांपैकी केवळ ७ टक्के निधीच सरकारने खर्च केला आहे, असे रविवारी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत