शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

तरुण रोज साडेसात तास इन्स्टा, FB वर; संसद घुसखोरीचे बेरोजगारी हे प्रमुख कारण : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 05:53 IST

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी सभागृहात उडी मारणे, ही नक्कीच सुरक्षेतील त्रुटी आहे; परंतु यामागचे कारण बेरोजगारी आहे. केंद्र सरकारने या तरुणांना रोजगार दिला नाही. त्यांना एकच मार्ग दिला आहे की, मोबाइलवर इन्स्टाग्राम दररोज साडेसात तास पाहत राहा. त्यामुळे हे तरुण संसदेत उडी मारून आले, अशा शब्दांत काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सरकारवर टीका केली आहे.

१४६ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर या विरोधात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारने विरोधी पक्षांचे १४६ खासदार निलंबित करून केवळ त्यांचा अपमान केला नाही, तर देशातील ६० टक्के जनतेचा आवाज बंद केला आहे. देशात प्रचंड बेरोजगारी आहे. देशातील तरुणांना आज रोजगार मिळत नाही. मी एक छोटा सर्व्हे केला, त्यातील अभ्यासाने मी हैराण झालो. देशातील तरुण फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्टिटर, फेसबुक आणि मोबाइलवर रोज ७.३० तास घालवत आहेत. देशातील तरुणांचा रोजगार हिसकावून घेतल्याने तरुणांवर ही वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकशाहीसाठी किंमत मोजण्याची तयारी : पवारदेशाची संसद आणि लोकशाही वाचविण्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती मोजण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्ष तयार आहेत, अशा विधानासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये जोश निर्माण केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाParliamentसंसदSharad Pawarशरद पवार