शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

आपचे आमदार म्हणतात, अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:26 IST

दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल...

नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या आमदारांनी केलेल्या मारहाणीवरून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. या मारहाणीच्या प्रकरणावरून दिल्लीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आमने-सामने आले असतानाच आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बलियान यांनी वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. उत्तमनगर येथे सभेला संबोधित करताना बलियान यांनी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेली मारहाण योग्य असल्याचे सांगत अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. उपस्थितांना संबोधित करताना नरेश बलियान म्हणाले, "मुख्य सचिवांसोबत जे काही झाले. त्यांनी जो खोटा आरोप केला, ते पाहता अशा अधिकाऱ्यांना फटकावलंच पाहिजे, असे मला वाटते. सर्वसामान्य लोकांच्या कामात खोडा घालणाऱ्या, कामे अडवणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत असेच वागले पाहिजे." दरम्यान, मुख्य सचिव मारहाणी प्रकरणी दोन आमदारांना अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानाची आज झडती घेण्यात आली. यावेळी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे 40 मिनिटे मागे असल्याचे समोर आले आहे. तसेच एकूण 21 कॅमेऱ्यांपैकी केवळ 14 कॅमेरेच सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दुसरीकडे दिल्ली सरकारमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने पीएमओ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली आहे. त्यावेळी दिल्ली सरकार अधिकाऱ्यांनां धमकावून काम करवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या चर्चेनंतर जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. त्यावेळी आपण अधिकाऱ्यांना भयमुक्त होऊन काम करण्यास सांगितल्याची माहिती दिली.  

टॅग्स :AAPआपNew Delhiनवी दिल्लीPoliticsराजकारण