शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हृदयस्पर्शी! आधी आई गेली मग बाबा, 'त्या' हरल्या नाहीत; मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 09:32 IST

कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर सहा मुली पोरक्या झाल्या. सहापैकी चौथ्या क्रमांकाच्या बहिणीने या घटनेनंतर कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. 

नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. आई-वडिलांचं छत्र हरपल्याने अनेक जण अनाथ झाले आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. आधी आई गेली नंतर बाबा पण मुली हरल्या नाहीत मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिघींनी संघर्ष केल्याची घटना समोर आली आहे. आई-व़डिलांचं छत्र हरपलं पण त्यांनी पैसे उधार घेऊन मोठ्या बहिणीचं लग्न लावलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर सहा मुली पोरक्या झाल्या. सहापैकी चौथ्या क्रमांकाच्या बहिणीने या घटनेनंतर कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. 

मोठ्या बहिणीचं तिने लग्न करून दिलं असून लहान बहिणींचा ती सांभाळ करत आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चार अविवाहित बहिणी अनाथ झाल्या. कुटुंब कसं चालवावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वडिलांच्या उपचारांसाठी आणि दुकानासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं आव्हान होतं पण यासर्व समस्यांवर मात करण्याचा निर्णय रेश्मानं म्हणजेच चौथ्या क्रमांकाच्या मुलीनं घेतला. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकारकडून मदत मिळते असं समजल्यावर या बहिणींनी वडिलांच्या निधनानंतर मदतीसाठी अर्ज केला. अनेकदा चकरा माराव्या लागला. त्यानंतर 5-6 महिन्यांनी 20 हजार रुपयांची मदत मिळाली मात्र मुख्यमंत्री कोविड चाइल्ड केअर योजनेतून कोणताही लाभ मिळाला नाही.

अधिकाऱ्यांनी तुमच्या वडिलांचा मृत्यू जानेवारीत झाला आहे. ज्या मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मार्च ते जून 2021 या कालावधीत मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी ही योजना होती असं सांगितलं. महिला बालकल्याण विभागाकडून अधिकाऱ्यांना अशा कुटुंबांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या बहिणींकडून वडिलांच्या कोरोनावरच्या उपचारांची कागदपत्रं मिळवली आणि या वर्षापासून स्पॉन्सर योजनेतून दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन सुरू केलं. रेश्माने वडिलांचं बंद असलेलं किराणा दुकान पुन्हा सुरू केलं आणि मोठ्या बहिणीला देखील आधार दिला

भोपाळ जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेंद्र सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वडिलांच्या निधनामुळं हे कुटुंब अडचणीत सापडलं आहे. कोविडमुळे वडिलांचं निधन झाल्यानं त्यांना 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. दोन अल्पवयीन बहिणींना चार हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येणार आहे. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. आरोग्यविम्यासोबतच दोन्ही मुलींचं वय 23 वर्षं पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यात एकरकमी निधी जमा होईल." रेश्माने लग्नासाठी काही पैसे जमा केले. ओळखीच्यांकडून सामान उधार घेतलं आणि सर्व बहिणींनी मिळून मोठ्या बहिणीचं लग्न लावून दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न