शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘स्टार्टअप महाकुंभ’ : तरुणच देत आहेत नोकऱ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:35 IST

ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

नवी दिल्ली : भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप्सचा बाजार आहे. देशातील तरुण याचे नेतृत्व करीत आहेत. स्टार्टअपचे नेतृत्व ४५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला करीत आहेत. देशातील तरुण आता नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारा बनला आहे.

ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. भारत मंडपममध्ये आयोजित ‘स्टार्टअप महाकुंभ’मध्ये ते बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, एआय, सेमिकंडक्टर आणि क्वांटम यासाठी सुरू केलेले तीन मिशन तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी देणार आहेत. 

जगभरातील गुंतवणूकदारांना यामुळे गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीम केवळ मोठ्या मेट्रो शहरांमध्ये नाही तर स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व लहान शहरांमधील तरुण करीत आहेत. 

भारतासाठी ही मोठी संधी एआयमध्ये भारताचे पारडे जड आहे, हे जगाने मान्य केले आहे. ही संधी गमावू नये यासाठी एआयला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. मला विश्वास आहे की, भारतीय तरुणांच्या संकल्पना अनेक देशांच्या समस्या सोडवू शकतील, असेही पंतप्रधान म्हणाले. 

२००० स्टार्टअप्स, १० देशांचे ३००० प्रतिनिधी भारत मंडपममध्ये भरलेला ‘स्टार्टअप महाकुंभ’ हा देशातील आजवरचा सर्वात मोठा व अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. देशभरातील २०००हून अधिक स्टार्टअप, १००० पेक्षा अधिक गुंतवणूकदार, १०० हून अधिक यूनिकॉर्न व ३०० पेक्षा अधिक इनक्युबेटर्स सामील झाले आहेत. दहापेक्षा अधिक देशांच्या ३००० हजारांहून अधिक प्रतिनिधींना यात सहभाग घेतला आहे. ५० हजारपेक्षा अधिक व्यावसायिकांना याला भेट दिली आहे. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (नाबार्ड), स्मॉल इंडस्ट्रीड डेव्हलपमेंट बँक (सिडबी), एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इसीजीसी) यांच्या पुढाकारातून याचे आयोजन केले आहे. 

देशात १.२५ लाख स्टार्टअप्स २०१४ मध्ये देशात १०० स्टार्टअप्सही नव्हते. आज ही संख्या १.२५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास १२ लाख तरुण स्टार्टअप्सशी थेट जोडले गेलेले आहेत. आमच्याकडे ११० पेक्षा अधिक यूनिकॉर्न आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

मी सुद्धा घेताे एआयची मदतमी स्वत: एआयची खूप मदत घेतो. निवडणूक प्रचारात प्रादेशिक भाषांमुळे अनेकदा अडचण येते. अशावेळी मी एआयच्या मदतीने माझे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवतो.     - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी