शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कुणाच्या घरात घुसून आंदोलन कसे काय करू शकता? हायकोर्टाचा 'आप'ला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 04:04 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी दिल्ली : दुसऱ्याच्या घरात त्याच्या परवानगीशिवाय शिरून तेथे धरणे धरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा मार्मिक सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केल्याने गेला आठवडाभर दिल्लीच्या राजनिवासात ठिय्या देऊन बसलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व अन्य तीन मंत्र्यांची मोठी पंचाईत झाली.दिल्लीच्या अधिकारीवर्गाने पुकारलेला अघोषित संप मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी द्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री ११ जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले आहेत. दोन या धरण्याच्या विरोधात तर एक अधिकाºयांच्या संपाच्या विरोधात अशा तीन याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.न्या. ए. के. चावला व न्या. नविन चावला यांच्या खंडपीठापुढे या याचिका सुनावणीसाठी सुनावमीसाठी आल्या तेव्हा दिल्ली सरकारच्या वकिलाने मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची मागणी कशी योग्य आहे, हे सांगण्यास सुरुवात केली. मंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकांना अधिकारी जात नाहीत, अशी कबुली देऊन आयएएस संघटनेने अधिकारी ‘अघोषित’ संपावर आहेत, यास दुजोराच दिला आहे, असे त्यांचे म्हणणे होते.यावर न्यायमूर्तींनी सरकारच्या वकिलावर प्रश्नांची सरबत्ती केली. न्यायमूर्तींनी त्यांना विचारले, तुम्ही (मंत्री) संपावर नाहीत, तर धरणे धरून बसले आहेत, असे तुमचे म्हणणे आहे. असे धरणे धरायला तुम्हाला कोणी परवानगी दिली. हा प्रत्येक मंत्र्याचा व्यक्तिगत निर्णय आहे, असे वकिलाने सांगितल्यावर न्यायालय म्हणाले, तुम्ही राजनिवासाच्या दारावर किंवा बाहेर नव्हे तर आत ठाण मांडले आहे. तेथे अशा प्रकारे धरणे धरायला तुम्हाला परवानगी कोणी दिली? दुस-याच्या घरात त्याच्या परानगीशिवाय शिरायचे आणि तेथे अहोरात्र बसून राहायचे याला संप किंवा धरणे म्हणत नाहीत. अशा गोष्टी करण्याच्या जागा वेगळ्या आहेत!हे धरणे बंद करण्याचा केजरीवाल यांना आदेश द्यावा, यासाठी भाजपा आमदार विजेंद्र गुप्ता यांनी केलेली नवी याचिकाही खंडपीठाने दाखल करून घेतली. आयएएस संघटनेसही प्रतिवादी करण्यास सांगून पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली गेली.

अधिकारी चर्चेस तयारअधिकाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असेल तर त्याची हमी मी देतो. त्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपणे हे माझे कर्तव्यच आहे, या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वक्तव्याचे दिल्ली प्रशासनातील अधिकारीवर्गाने स्वागत केले आहे. मुख्यमंत्री ठोस हस्तक्षेप करणार असतील तर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल, असे दिल्ली कॅडरच्या अधिकारी संघटनेने म्हटले. मात्र आम्ही संपावर नाही. पूर्ण उत्साहाने व समर्पणाने आम्ही काम करीत आहोत, असे संघटनेने ट्विट केले.>दिल्लीकर पोळताहेतदिल्लीचे मुख्यमंत्री नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरून बसलेत. भाजपावाल्यांनीे मुख्यमंत्र्यांच्या घरी धरणे धरलेय. दिल्लीचे अधिकारी पत्रकार परिषद घेताहेत. या सर्व अनागोंदीकडे पंतप्रधान काणाडोळा करताहेत एवढेच नव्हे तर त्याला प्रोत्साहन देताहेत. या सर्व नाटकाने दिल्लीचे नागरिक मात्र भरडले जाताहेत.-राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालCourtन्यायालयdelhiदिल्ली