शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

200, 2000 रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 10:55 IST

200, 2000 रुपयांच्या खराब, फाटलेल्या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा....

मुंबई - नोटांबदी लागू झाल्यानंतर RBIकडून 200 रुपये व 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. पण व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतच्या समस्या वाढताहेत. कारण, तुमच्याजवळ  असलेल्या 200 किंवा 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही कारणामुळे जर खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर त्या नोटा बदलून मिळणार नाहीत. शिवाय, बँकांमध्ये जमादेखील करता येणार नाहीयेत.  

कारण, चलनातील नोटांच्या देवाणघेवाणांसंबधीच्या नियमावलीत या नवीन नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यामुळे फाटलेल्या, खराब अवस्थेत असलेल्या 200 व 2000 रुपयांचा नोटा तुमच्याकडे असतील तर वेळीच सावध व्हा. फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा बदलणं ( नोट एक्सचेंज), जमा करण्याचा प्रकार आरबीआय नियमांतर्गंत येतो. हा नियम आरबीआय कायद्याच्या कलम 28 चा एक भाग आहे. या कायद्यामध्ये 5, 10, 50, 100, 500 रुपयांच्या नोटांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र 200 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा यात उल्लेखच नाही. याचे कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयनं या नोटांच्या आदान-प्रदान लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केलेले नाहीत. यामुळे 200 किंवा 2000 नोटा फाटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या बँकांमध्ये जमा करता येणार नाहीयेत शिवाय बदलतादेखील येणार नाहीयेत.

8 नोव्हेंबर 2016मध्ये नोटाबंदी नियम लागू झाल्यानंतर 2,000 रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली यानंतर 200 रुपयांची नोट ऑगस्ट 2017मध्ये वापरात आली. आरबीआयनं आता 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. 

बँकर्संकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन सीरिजमध्ये फाटलेल्या-खराब झालेल्या नोटांचं प्रमाण कमी आहे. मात्र आरबीआयच्या नियमांमध्ये बदल केले गेले नाहीत तर अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक