शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

'तुम्ही अन्य कुठे जिंकू शकत नाही, पाकिस्तान नाहीतर बांगलादेशमध्ये जाऊन पक्ष स्थापन करा', ओवेसींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 16:26 IST

भाजपा खासदार विनय कटियार यांनी मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे

नवी दिल्ली - भाजपा खासदार विनय कटियार यांनी मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. 'तुम्ही अन्य कुठे जिंकू शकत नाही त्यामुळे पाकिस्तान नाहीतर बांगलादेशमध्ये जाऊन पक्ष स्थापन करा', असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे. असदुद्दीन ओवेसी गेल्या काही दिवसांपासून भाजपाविरोधी वक्तव्यं करत आहेत. यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विनय कटियार यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

'ओवेसींनी हवे तितके प्रयत्न केले तरी ते फक्त आपल्याच मतदारसंघात जिंकू शकतात. त्यांची लोकसंख्या तिथेच जास्त असून इतर कुठेही नाही. त्यामुळे अन्य कुठेही ते जिंकू शकत नाहीत. त्यांचा प्रभाव वाढत नाहीये, त्यामुळे ते व्याकूळ झाले आहेत. म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं ते करत आहेत. त्यांच्याकडे अन्य कोणताही विषय नाहीये. त्यांच्यासाठी चांगलं आहे की त्यांनी बांगलादेशला जावं आणि पक्ष स्थापन करावा. नाहीतर मग पाकिस्तानला जावं आणि तिथे पक्ष स्थापन करावा. तिथे कदाचित ते काही जागा जिंकतील. त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही', असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे. 

यावेळी एका पत्रकाराने विनय कटियार यांना याचा अर्थ ओवेसी यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशात जाऊन पक्षविस्तार करावा असं म्हणायचं आहे का ? विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करण्यात काय वाईट आहे. तिकडे जाऊनही प्रयत्न करा, बघा कशाप्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. त्याआधारे निर्णय घ्यावा'. 

लष्करप्रमुखांनी राजकीय गोष्टींमध्ये नाक खुपसू नये- ओवेसीलष्करप्रमुखांनी देशातील राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, असे सांगत एमआयएमचे खासदार असुदद्दीन ओवेसी यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या विधानाविषयी नापसंती दर्शविली होती. दिल्लीत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात बिपीन रावत यांनी आसाममधील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी रावत यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला. 

ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, लष्करप्रमुखांनी देशातील राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या विस्ताराबाबत मतप्रदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य नाही. लोकशाहीने व देशाच्या संविधानाने राजकीय पक्षांना स्वातंत्र्य दिले आहे. लष्कराने नेहमीच देशातील जनतेने निवडून दिलेल्या नेतृत्वाच्या आदेशानुसार काम केले पाहिजे, असे ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बिपीन रावत बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात बोलत होते. यावेळी त्यांनी ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आसाममधील मौलाना बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) या संघटनेचे उदाहरण दिले. ही संघटना गेल्या काही वर्षांमध्ये भाजपापेक्षाही वेगाने वाढत आहे. काही वर्षांपूर्वी जनसंघाचे केवळ 2 खासदार होते आणि तरीही भाजपा आज या स्तरावर पोहोचली आहे. परंतु, एआययूडीएफच्या विस्ताराचा वेग थक्क करणारा आहे. ही संघटना भाजपापेक्षा कितीतरी वेगाने विस्तारत चालली आहे. एक दिवस असा येईल की, आपल्याला आसामासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. आपण आता ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या स्वरुपावर नियंत्रण ठेवू शकतो, असे मला वाटत नाही. यापूर्वी या परिसरातील केवळ पाच जिल्ह्यांमध्येच मुस्लीमबहुल लोकसंख्या होती. मात्र, आता या जिल्ह्यांची संख्या साधारण 8 ते 9 इतकी झाली आहे. त्यामुळे आता या लोकांना आपल्यात सामावून घेण्यातच शहाणपणा आहे, असे रावत यांनी सांगितले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी