शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तुम्ही आगीशी खेळत आहात..., पंजाबमधील घटनाक्रमाबाबत सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:57 IST

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची बैठक का स्थगित केली, अधिवेशन का पुढे ढकलण्यात आले नाही, असा सवालही खंडपीठाने पंजाब सरकारला केला.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांच्या मंजुरीवरून पंजाब सरकार आणि राज्यपाल यांच्यात सुरू असलेला तिढा गंभीर चिंतेचा विषय आहे, असे सांगत त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही आगीशी खेळत आहात, असेही न्यायालाने म्हटले आहे.

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने पंजाब सरकार आणि राज्यपाल या दोघांना सांगितले की, ‘आपला देश प्रस्थापित परंपरा आणि परंपरांनी चालवला जातो आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.’ राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती न दिल्याबद्दल पंजाबच्या राज्यपालांवर नाराजी व्यक्त करत खंडपीठाने म्हटले की, तुम्ही आगीशी खेळत आहात. विधानसभेचे अधिवेशन असंवैधानिक घोषित करण्याच्या त्यांच्या अधिकारावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची बैठक का स्थगित केली, अधिवेशन का पुढे ढकलण्यात आले नाही, असा सवालही खंडपीठाने पंजाब सरकारला केला. विधेयकांना मंजुरी देण्याच्या राज्यपालांच्या अधिकाराच्या मुद्द्यावर कायदा निश्चित करण्यास एक संक्षिप्त आदेश देण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले. राज्यपाल पुरोहित यांनी राज्य विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकांवर केलेल्या कारवाईचा तपशील पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय