शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

योगी सरकारचा 'मेगा प्लॅन', राज्यातील 4.50 लाख लोकांना रोजगार मिळणार

By ravalnath.patil | Updated: October 5, 2020 16:41 IST

Uttar Pradesh CM Yogi Adityanath : राज्य सरकारने लोकसेवा केंद्रातील संचालकांचे उत्पन्न प्रती व्यवहार 4 रुपयांऐवजी 11 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्यातील 3 ते 4.50 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळतील.

लखनऊ : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार योगी सरकारने मोठी घोषणा केली आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशात 1.50 लाख नवीन जनसेवा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) उघडण्याचा निर्णय घेतला आहे. योगी सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील 3 ते 4.50 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळतील. एका जनसेवा केंद्रामध्ये 3 ते 4 जण काम करण्याची शक्यता आहे. तसेच, राज्य सरकारने जनसेवा केंद्रातील संचालकांचे उत्पन्न प्रती व्यवहार 4 रुपयांऐवजी 11 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएससी देशातील सर्व राज्यांमध्ये पीपीपी मॉडेलवर काम करते. जनसेवा केंद्रांवर अनेक प्रकारची कामे केली जातात. जर तुम्हाला जनसेवा केंद्र उघडायचे असेल, तर यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडव्या लागतात. त्यानंतर तुम्हाला जनसेवा केंद्राचा परवाना मिळू शकतो. यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही.

अलिकडच्या वर्षांत, गरीब लोकांना केवळ जनसेवा केंद्रांद्वारे सरकारच्या बर्‍याच योजनांची माहिती आणि लाभ मिळत आहेत. आधार कार्ड तयार करण्यापासून ते अपडेट करण्यापर्यंत किंवा बँकांकडील व्यवहार किंवा केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा जनसेवा केंद्रांमार्फत मिळत आहे. याशिवाय पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जनगणना, आर्थिक जनगणना यासह अनेक प्रकारची कामे जनसेवा केंद्रांमार्फत केली जात आहेत.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील पीपीपी मॉडेलवर 119 हजार जनसेवा केंद्रे सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत संपूर्ण राज्यात 1.50 लाख आणखी जनसेवा केंद्रे सुरू केली जातील. सध्या एका ग्रामपंचायतीत एक जनसेवा केंद्र उघडण्यात आले आहे. आणखी संख्या वाढविण्याचे काम आता सुरू झाले आहे. तसे पाहिले तर प्रति 10 हजार लोकसंख्येमागे एक जनसेवा केंद्र असते. ग्रामीण पातळीवर रोजगार मिळवून तरुण उद्योजक बनविण्याची आणि जनसेवा केंद्रांच्या माध्यमातून आत्मनिर्भरता ही येत्या काही दिवसांत सरकार अधिक वेगवान करणार आहे.

देशात 10 हजार लोकसंख्येनुसार एक जनसेवा केंद्र उघडण्यात आले आहे. आता जनसेवा केंद्रांची संख्या वाढविण्यावर काम सुरू झाले आहे. याची सुरुवात उत्तर प्रदेशात झाली आहे. याठिकाणी आता दीड लाख जनसेवा केंद्रे उघडली जाणार आहेत. मात्र, सीएससीने गेल्या काही दिवसांपासून त्याचे दर वाढविले आहेत. या निर्णयाचा सामान्य लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संमतीनंतरच जनसेवा केंद्रांनी हे पैसे वाढवले ​​आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम लोकांवर होत आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशjobनोकरीGovernmentसरकार