शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांच्या मृत्यूस योगी सरकार जबाबदार,आदित्यनाथांनी तात्काळ राजीनामा द्यावा: गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 17:25 IST

गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं लहान मुलांच्या मृत्यूंमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे.

औरंगाबाद, दि. 13 - गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं लहान मुलांच्या मृत्यूंमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे. गोरखपूर येथे ऑक्सिजनअभावी मुलांच्या मृत्युस योगी आदित्यनाथ सरकार जबाबदार आहे. त्यामुळे  योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा दिला  पाहिजे, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद  यांनी केली आहे. ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी औरंगाबादेत आले होते. गोरखपूर हा आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. पण मी केंद्रीय आरोग्य मंत्री असताना १७ वेळा गोरखपूरच्या त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. खराब पाण्यामुळे मृत्युचे प्रमाण खूपच वाढलेले होते. पण आम्ही अनेक उपाययोजना करुन मृत्युदर नियंत्रणात आणला. परंतु आता ऑक्सिजन न मिळाल्याने बालकांचे मृत्यू झाले आहेत. हा हॉस्पिटल प्रशासनाच्या  निष्काळजीपणाचा कळस होय. योगी सरकार याला जवाबदार आहे. म्हणून योगी आदत्यिनाथ यांनी नैतिकता स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे, असं आझाद म्हणाले. केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेवर चालू आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून  चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना दिलेली सारी आश्वासने विसरुन गेलेले आहेत. आणि केवळ स्वत:चा एक अजेंडा राबवण्यात ते मश्गुल आहेत. त्यांच्यामुळे संघ परिवार सोडता सारेच घटक असुरक्षित असल्याचा आरोप आझाद यांनी पत्रपरिषदेत केला. शरद पवार युपीएबरोबरचनुकतीच दिल्लीत केंद्र सरकारविरोधी रणनिती आखण्यासाठी युपीएची बैठक झाली. त्याला युपीएचे सारे घटक पक्ष उपस्थित होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित नव्हते, त्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात होते. याकडे लक्ष वेधता गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, मी शरद पवारांना त्यादिवशी फोनने संपर्क साधला होता. परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत. पण ते युपीएबरोबरच आहेत.६५ देशांना भेटी देण्याचे विसरले नाहीतगुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. निवनू येण्यापूर्वी दहा कोटी युवकांंना नोकºया देण्याचे आश्वासन ते विसरले, शेतक-यांच्या शेतीमलाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे ते विसरले. आज शेतकरी रोज आत्महत्त्या करीत आहेत. त्याकडे त्यांचे लक्ष नाही. पण पाच वेळा अमेरिकेला भेट देण्याचे आणि एकूण ६५ देशांना भेटी देण्याचे ते बरे विसरले नाहीत, असा उपहास आझाद यांनी केला.जयराम रमेश यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे, याकडे लक्ष वेधता  आझाद म्हणाले, आमच्या पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. योग्य मतांचा पक्षात आदर केला जातो. गोरक्षेच्या मुद्यावरुन सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, हिंदू बांधवांना हे मान्य नाही. अनेक हिंदू बांधवांनी या घटनांचा निषेध नोंदवला आहे, जीएसटीमुळे देशातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.एक नवी लोकशाही.....नरेंद्र मोदी यांच्या घणाघात घालताना गुलाम  नबी आझाद यांनी सांगितले की, एक नवी लोकशाही ते रुढ करीत आहेत. दिलेली आश्वासने पाळायची नाहीत. स्वत:चाच अजेंडा वापरायचा हा त्यांचा खाक्या दिसूनत येतो. आज देशात मिडियासुध्दा सुरक्षित नाही. महिला, अल्पसंख्यक, दलित, युवक, शेतकरी कुणीही सुरक्षित नाही. फक्त नरेंद्र मोदी आणि संघ परिवार तेवढा सुरक्षित दिसतो.ही ती नवी लोकशाही होय.पत्रपरिषदेस, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, आ. सुभाष झांबड, एम.एम. शेख, डॉ, कल्याण काळे, अरुण मुगदिया आदीची उपस्थिती होती.