शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'योगी आदित्यनाथांनी मंदिरांचा दौरा करण्याऐवजी लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 15:12 IST

गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (बीआरडी) 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे

लखनऊ -  गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (बीआरडी) 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे. डिपोर्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसीनचे प्रमुख डॉ डी के श्रीवास्तव यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 'मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 15 बाळांना एक महिनाही पुर्ण झाला नव्हता. उर्वरित 15 बाळांपैकी सहाजण ज्यांना एक महिना पुर्ण झाला होता त्यांचा मेंदूला सूज आल्याने मृत्यू झाला. तर इतरांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला', अशी माहिती  डॉ डी के श्रीवास्तव यांनी दिली आहे. 

याआधीही गोरखपूर हॉस्पिटल चर्चेत आलं होतं, जेव्हा फक्त सहा दिवसांत 60 मुलांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर समाजवादी पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करत निषेध नोंदवला आहे. 

समाजवादी पक्षाचे प्रवक्ता सुनील यादव बोलले आहेत की, 'गोरखपूरमध्ये अशी घटना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या घटनेनंतरही राज्य सरकारने चौकशी करण्यासाठी कोणताही आदेश दिला नसून, काहीच हालचाल करताना दिसत नाहीयेत. सरकार निष्क्रीय असल्याचं पाहून दुख: होतंय. सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार शांत बसून सर्व पाहत आहे'.

'राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळांचा दौरा करण्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांनी गंभीरपणे लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं', असं सुनील यादव बोलले आहेत. 

बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यात चार दिवसांमध्ये ६९ मुलांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० ऑक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ ऑक्टोबरला झाला.

ऑगस्टमध्ये २९० बालमृत्यू झाले. त्यापैकी एका दिवसात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या रुग्णालयाला प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाºयाचे बिल दिले न गेल्यामुळे त्याने पुरवठा थांबवला, असाही आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला व चौकशीही झाली. आॅक्सिजन पुरवठादाराला अटकही झाली होती.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथGorakhpurगोरखपूर