शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:29 IST

विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.

लखनऊ: दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. तसेच विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचारही घेतला. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात जास्त फरक नसल्याचा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला. 

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे राहुल गांधी देशाबद्दल वाईट बोलतात आणि अखिलेश यादव प्रदेशाबद्दल, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात बोलताना, एकदा एका शाळेत गेलो होतो. तेव्हा तेथील मुलांना विचारले की, तुम्ही मला ओळखता का, या प्रश्नावर मुलांनी होकारार्थी मान डोलावून तुम्ही राहुल गांधी आहात, असे म्हटले, असा मजेशीर किस्सा अखिलेश यादव यांनी सभागृहात सांगितला. यानंतर सर्व सदस्य मनमोकळेपणाने हसले. हाच धागा पकडून योगी आदित्यनाथ यांनी टोलेबाजी केली. 

लहान मुले भोळी-भाबडी असतात, ते नेहमी खरे बोलतात

यावर बोलताना लहान मुले भोळी-भाबडी असतात. मुले नेहमी सत्यकथन करतात, खरे बोलतात. त्यांनी विचारपूर्वकच उत्तर दिले असणार. तसे पाहता तुमच्यात आणि राहुल गांधींमध्ये फार जास्त फरक नाही. ते देशाबद्दल वाईट बोलतात आणि तुम्ही प्रदेशाबद्दल, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टोला लगावला. अखिलेश यादव यांच्या गोमयाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आताच्या काळात गोमयापासून अगरबत्तीही बनवल्या जात आहेत. मला वाटले की, जर तुम्ही घरी पूजा करत असता, तर तुम्ही अगरबत्ती लावत असाल. मला वाटते की, विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर ते गोमातेच्या कल्याणाची भाषा बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून चालवणाऱ्या जाणाऱ्या योजनांवर चर्चा झाली. विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की, हा समाजवाद आहे. मात्र, यानिमित्ताने का होईना, विरोधकांनी पंतप्रधानांच्या गरीब कल्याण कार्यक्रमाचे कौतुक केले, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधी