शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:26 IST

गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ठळक मुद्देयासाठी योगी आदित्यनाथ यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहेही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेलएमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल

लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर मजूर बेरोजगार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथसरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. या समितीचे अध्यक्ष कृषि उत्पादन आयुक्त असतील. तसेच ग्राम विकास, पंचायती राज, एमएसएमई तसेच कौशल्य विकासच्या मुख्य सचिवांचा यात समावेश असेल. ही समिती ओडीओपीअंतर्गत रोजगार निर्मितीबरोबरच बँकांच्या माध्यमाने लोन मेळावे आणि रोजगार मेळावेही आयोजित करेल. यामुळे लोकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळतील. या शिवाय ही समिती रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा निर्माण होतील यासंदर्भातही सूचना देईल. एवढेच नाही, तर एमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने रिव्हॉल्विंग फण्डमध्ये वाढ केली आहे. याच्या माध्यमातून महिला स्वयंसेवी गटांच्या विविध प्रकारच्या कार्यांना उत्तेजन देऊन रोजगार निर्मिती केली जाईल. यात शिलाई, लोणचे, मसाला तयार करणे यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. या महिला जे तयार करतील त्याचे मार्केटिंग ओडीओपीच्या माध्यमाने केली जाईल. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सूचना दिला आहे, की 20 एप्रिलनंतर ज्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे, केवळ अशाच ठिकाणी काही प्रमाणात सूट असेल. मात्र, जेथे 10 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्थ आहेत, तेथे तीन मेपर्यंत बंद असेल. कोरोनाचा फैलाव कोणत्याही परिस्थितीत रोखायचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथLabourकामगारGovernmentसरकार