शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:26 IST

गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ठळक मुद्देयासाठी योगी आदित्यनाथ यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहेही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेलएमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल

लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर मजूर बेरोजगार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथसरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. या समितीचे अध्यक्ष कृषि उत्पादन आयुक्त असतील. तसेच ग्राम विकास, पंचायती राज, एमएसएमई तसेच कौशल्य विकासच्या मुख्य सचिवांचा यात समावेश असेल. ही समिती ओडीओपीअंतर्गत रोजगार निर्मितीबरोबरच बँकांच्या माध्यमाने लोन मेळावे आणि रोजगार मेळावेही आयोजित करेल. यामुळे लोकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळतील. या शिवाय ही समिती रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा निर्माण होतील यासंदर्भातही सूचना देईल. एवढेच नाही, तर एमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने रिव्हॉल्विंग फण्डमध्ये वाढ केली आहे. याच्या माध्यमातून महिला स्वयंसेवी गटांच्या विविध प्रकारच्या कार्यांना उत्तेजन देऊन रोजगार निर्मिती केली जाईल. यात शिलाई, लोणचे, मसाला तयार करणे यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. या महिला जे तयार करतील त्याचे मार्केटिंग ओडीओपीच्या माध्यमाने केली जाईल. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सूचना दिला आहे, की 20 एप्रिलनंतर ज्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे, केवळ अशाच ठिकाणी काही प्रमाणात सूट असेल. मात्र, जेथे 10 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्थ आहेत, तेथे तीन मेपर्यंत बंद असेल. कोरोनाचा फैलाव कोणत्याही परिस्थितीत रोखायचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथLabourकामगारGovernmentसरकार