शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय, पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना देणार रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:26 IST

गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ठळक मुद्देयासाठी योगी आदित्यनाथ यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहेही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेलएमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल

लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर मजूर बेरोजगार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथसरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. 

ही समिती या मजुरांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. या समितीचे अध्यक्ष कृषि उत्पादन आयुक्त असतील. तसेच ग्राम विकास, पंचायती राज, एमएसएमई तसेच कौशल्य विकासच्या मुख्य सचिवांचा यात समावेश असेल. ही समिती ओडीओपीअंतर्गत रोजगार निर्मितीबरोबरच बँकांच्या माध्यमाने लोन मेळावे आणि रोजगार मेळावेही आयोजित करेल. यामुळे लोकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळतील. या शिवाय ही समिती रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा निर्माण होतील यासंदर्भातही सूचना देईल. एवढेच नाही, तर एमएसएमईअंतर्गत विविध उद्योंगांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावरही ही समिती अभ्यास करेल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने रिव्हॉल्विंग फण्डमध्ये वाढ केली आहे. याच्या माध्यमातून महिला स्वयंसेवी गटांच्या विविध प्रकारच्या कार्यांना उत्तेजन देऊन रोजगार निर्मिती केली जाईल. यात शिलाई, लोणचे, मसाला तयार करणे यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. या महिला जे तयार करतील त्याचे मार्केटिंग ओडीओपीच्या माध्यमाने केली जाईल. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सूचना दिला आहे, की 20 एप्रिलनंतर ज्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे, केवळ अशाच ठिकाणी काही प्रमाणात सूट असेल. मात्र, जेथे 10 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्थ आहेत, तेथे तीन मेपर्यंत बंद असेल. कोरोनाचा फैलाव कोणत्याही परिस्थितीत रोखायचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथLabourकामगारGovernmentसरकार