शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'संपूर्ण देश राममय, असं वाटतंय की आपण त्रेतायुगात आलोय', योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:43 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. आज संपूर्ण देश राममय झाला आहे. असं वाटतंय की आम्ही त्रेतायुगाच आलोय. आज आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तिथंच आज मंदिर उभं राहिलंय.

अयोध्येतील राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामधून रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. आज संपूर्ण देश राममय झाला आहे. असं वाटतंय की आम्ही त्रेतायुगाच आलोय. आज आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तिथंच आज मंदिर उभं राहिलंय.

उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामललांचा जयजयकार केला. योगी म्हणाले की, रामोत्सवाच्या या पावन प्रसंगी मी सर्वांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो. आज मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शद्ब सूचत नाही आहेत. आज अशा ऐतिहासिक आणि पावन प्रसंगी भारताचं प्रत्येक शहर आणि प्रत्येक गाव अयोध्या धाम बनलं आहे. प्रत्येक मार्ग अयोध्येतील जन्मभूमीच्या दिशेने येत आहे. प्रत्येक नेत्र समाधानाच्या अश्रूंनी भिजलेले आहेत.  संपूर्ण देश राममय झालाय. असं वाटतंय की, आम्ही त्रेतायुगात आलोय. आज रघुनंदन, राधव आणि रामलला आपल्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत.

योगी पुढे म्हणाले की, आजचा दिवस माझ्या वैयक्तिक जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. श्री राम जन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळेच मला महंत अवैद्यनाथ यांचा सहवास प्राप्त झाला. श्रीराम जन्मभूमी मुक्ती महायज्ञ   सनातन आस्था आणि विश्वासाचा परीक्षाकाळ होता. तसेच त्यामधून भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचा हेतूही साध्य झाला. श्रीरामजन्मभूमी मंदिराची स्थापन भारताच्या सांस्कृतिक पुनर्गठनाचं आध्यात्मिक अनुष्ठान होतं.  तसेच हे राम मंदिर आणि येथील श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय गौरवाचा ऐतिहासिक प्रसंग आहे. जिथे हे राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. तिथेच हे मंदिर उभं राहतंय, याचा आम्हाला आनंद आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या