शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'संपूर्ण देश राममय, असं वाटतंय की आपण त्रेतायुगात आलोय', योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:43 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. आज संपूर्ण देश राममय झाला आहे. असं वाटतंय की आम्ही त्रेतायुगाच आलोय. आज आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तिथंच आज मंदिर उभं राहिलंय.

अयोध्येतील राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामधून रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. आज संपूर्ण देश राममय झाला आहे. असं वाटतंय की आम्ही त्रेतायुगाच आलोय. आज आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तिथंच आज मंदिर उभं राहिलंय.

उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामललांचा जयजयकार केला. योगी म्हणाले की, रामोत्सवाच्या या पावन प्रसंगी मी सर्वांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो. आज मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शद्ब सूचत नाही आहेत. आज अशा ऐतिहासिक आणि पावन प्रसंगी भारताचं प्रत्येक शहर आणि प्रत्येक गाव अयोध्या धाम बनलं आहे. प्रत्येक मार्ग अयोध्येतील जन्मभूमीच्या दिशेने येत आहे. प्रत्येक नेत्र समाधानाच्या अश्रूंनी भिजलेले आहेत.  संपूर्ण देश राममय झालाय. असं वाटतंय की, आम्ही त्रेतायुगात आलोय. आज रघुनंदन, राधव आणि रामलला आपल्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत.

योगी पुढे म्हणाले की, आजचा दिवस माझ्या वैयक्तिक जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. श्री राम जन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळेच मला महंत अवैद्यनाथ यांचा सहवास प्राप्त झाला. श्रीराम जन्मभूमी मुक्ती महायज्ञ   सनातन आस्था आणि विश्वासाचा परीक्षाकाळ होता. तसेच त्यामधून भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचा हेतूही साध्य झाला. श्रीरामजन्मभूमी मंदिराची स्थापन भारताच्या सांस्कृतिक पुनर्गठनाचं आध्यात्मिक अनुष्ठान होतं.  तसेच हे राम मंदिर आणि येथील श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय गौरवाचा ऐतिहासिक प्रसंग आहे. जिथे हे राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. तिथेच हे मंदिर उभं राहतंय, याचा आम्हाला आनंद आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या