शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:00 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांची मालदा येथे जनसभातृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर टीकास्त्र'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार असल्याचा आरोप

मालदा :पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी गो-तस्करी, जय श्रीराम घोषणा, तृणमूलची गुंडगिरी, CAA अशा अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda)

पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा देण्यावरही बंदी घातली जात आहे. प्रभू श्रीरामांच्या घोषणेलाही बंदी घालणाऱ्या रामद्रोह्यांचे आता पश्चिम बंगालमध्ये काहीही काम राहिलेले नाही. बंगालमधील जनता शक्तीपूजक आहे. मात्र, दुर्गा पूजनावरही येथे बंदी घातली जाते. ईदच्या निमित्ताने गोहत्या केली जाते, अशी टीका करत भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर या सर्व गोष्टी बंद होतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार  

CAA वरूनही योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. 'सीएए'प्रकरणावर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार हा प्रायोजित होता, असा आरोप करत पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहाद प्रकरणी सरकारकडून काहीच कारवाई केली जात असल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना केला. 

तृणमूलच्या गुंडांना हद्दपार करणार

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडांकडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांचीही हत्या करण्यात येतात. मात्र, ममता सरकारने त्याविरोधात काही कारवाई केली नाही. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईल आणि २ मेनंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड भीक मागत फिरताना दिसतील, असे निशाणा योगी आदित्यनाथ यांनी साधला. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर २ मे रोजी मतमोजणी होईल. पश्चिम बंगालसह, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्याक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अलीकडेच जाहीर करण्यात आला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल