शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:00 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले.

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांची मालदा येथे जनसभातृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर टीकास्त्र'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार असल्याचा आरोप

मालदा :पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी गो-तस्करी, जय श्रीराम घोषणा, तृणमूलची गुंडगिरी, CAA अशा अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda)

पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा देण्यावरही बंदी घातली जात आहे. प्रभू श्रीरामांच्या घोषणेलाही बंदी घालणाऱ्या रामद्रोह्यांचे आता पश्चिम बंगालमध्ये काहीही काम राहिलेले नाही. बंगालमधील जनता शक्तीपूजक आहे. मात्र, दुर्गा पूजनावरही येथे बंदी घातली जाते. ईदच्या निमित्ताने गोहत्या केली जाते, अशी टीका करत भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर या सर्व गोष्टी बंद होतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार  

CAA वरूनही योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. 'सीएए'प्रकरणावर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार हा प्रायोजित होता, असा आरोप करत पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहाद प्रकरणी सरकारकडून काहीच कारवाई केली जात असल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना केला. 

तृणमूलच्या गुंडांना हद्दपार करणार

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडांकडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांचीही हत्या करण्यात येतात. मात्र, ममता सरकारने त्याविरोधात काही कारवाई केली नाही. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईल आणि २ मेनंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड भीक मागत फिरताना दिसतील, असे निशाणा योगी आदित्यनाथ यांनी साधला. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर २ मे रोजी मतमोजणी होईल. पश्चिम बंगालसह, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्याक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अलीकडेच जाहीर करण्यात आला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल