शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

योगी सरकारची अनोखी योजना, नववधूंना मिळणार 20 हजार रुपये व स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 13:09 IST

उत्तर प्रदेशातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी योगी सरकारने घेतली आहे. सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करुन लग्नसोहळ्यात  होणारा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे केला जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत नववधूच्या खात्यात 20 हजार रुपये योगी सरकारकडून जमा केले जाणार आहेत.

लखनौ, दि. 1 - उत्तर प्रदेशातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी योगी सरकारने घेतली आहे. सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करुन लग्नसोहळ्यात  होणारा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे केला जाणार आहे. यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनेत खासदार, आमदार यांच्याव्यतिरिक्त समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत नववधूच्या खात्यात 20 हजार रुपये योगी सरकारकडून जमा केले जाणार आहेत. जेणेकरुन या मदतीचा वापर त्यांना भविष्यातील गरजा पूर्ण करण्यास होऊ शकेल. सोबत एक स्मार्टफोनदेखील त्यांना भेटस्वरुपात दिला जाणार आहे. समाज कल्याण विभागानं या योजनेसंदर्भातील प्रस्ताव शासनकडे पाठवला आहे. आता प्रतीक्षा आहे केवळ योजनेच्या अंमलबजावणीची.

मिळालेल्या माहितीनुसार, या सामूहिक विवाहाची सर्व जबाबदारी जिल्हाधिका-यांवर असणार आहे. या योजनेचा प्रस्ताव पारित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात 70 हजारहून अधिक मुला-मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विवाह कार्यक्रमा समितीची स्थापनाही केली जाणार आहे. जर एखाद्या ठिकाणी पाचहून अधिक विवाह सोहळे असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिका-यांसहीत संबंधित प्रशासकीय अधिका-यांवर असणार आहे.  विवाह कार्यक्रम समितीद्वारे वधूंना आर्थिक मदत, स्मार्टफोनशिवाय भांडी व कपडेही भेटस्वरुपात दिले जाणार आहेत.  

सरकारतर्फे नव वधूंना एकूण 35 हजार रुपये दिले जाणार आहेत, यातील 20 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. उर्वरित 10 हजार रुपये कपडे, भांडीकुंडी व अन्य साहित्यासाठी वापरले जाणार आहेत. दरम्यान, या योजनेतही आरक्षण असणार आहे.  शिवाय, सामूहिक विवाह योजनेचा लाभ 15 टक्के अल्पसंख्याकांनाही दिला जाणार आहे. योजने अंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना 30 टक्के, मागास वर्गीयांना 35 टक्के, सामान्य वर्ग 20 टक्के व 15 टक्के अल्पसंख्याकांना लाभ दिला जाणार आहे. मुख्य म्हणजे एखाद्या संस्थेलाही या योजनेत हातभार लावण्याची इच्छा असल्यास ते मदत करू शकतात, मात्र यापूर्वी संबंधित संस्थेला समितीला ठरविक कालवधीपूर्वी माहिती द्यावी लागेल.