शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violence: Yogendra Yadav शेतकरी आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित, लखीमपूरमध्ये मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेल्याने कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:57 IST

Yogendra Yadav suspended: Samyukt Kisan Morchaचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते Yogendra Yadav यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) मारल्या गेलेल्या BJP कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव यांना आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे. लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी, एक पत्रकार, दोन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचा समावेश होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर योगेंद्र यादव यांच्याविरोधात हा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. निलंबनाच्या कालावधीत योगेंद्र यादव शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. याबाबत यादव यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यादव यांनी गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. कारण त्यांची भेट घेतली पाहिजे, असे त्यांना वाटले होते. लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर झाले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती.

भारतीय किसान युनियन दोआबाचे अध्यक्ष मंजित सिंग राय यांनी सांगितले की, या प्रकरणी ३२ शेतकरी संघटनांचे एकमत होते. तसेच संघटनांकडून यादव यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यादव हे भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेल्याने दु:खी नव्हते. मात्र याबाबत आधी शेतकरी संघटनांना कल्पना न दिल्याने माफी मागण्यास तयार आहेत.

हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर पाच दिवसांनी आशिष मिश्रा याला अटक झाली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये दिसलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमित जयस्वाल याचाही समावेश आहे. तो व्हायरल व्हिडीओमध्ये पळून जाताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीमुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले, अशा प्रकारची तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ड्रायव्हर, मित्र आणि भाजपाचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलन