शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Lakhimpur Kheri Violence: Yogendra Yadav शेतकरी आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित, लखीमपूरमध्ये मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेल्याने कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:57 IST

Yogendra Yadav suspended: Samyukt Kisan Morchaचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते Yogendra Yadav यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) मारल्या गेलेल्या BJP कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव यांना आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी लखीमपूर-खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने ४६ शेतकरी संघटनांच्या समुहाने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे. लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी, एक पत्रकार, दोन भाजपा कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरचा समावेश होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर योगेंद्र यादव यांच्याविरोधात हा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. निलंबनाच्या कालावधीत योगेंद्र यादव शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. याबाबत यादव यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, यादव यांनी गेल्या आठवड्यात भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. कारण त्यांची भेट घेतली पाहिजे, असे त्यांना वाटले होते. लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर झाले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती.

भारतीय किसान युनियन दोआबाचे अध्यक्ष मंजित सिंग राय यांनी सांगितले की, या प्रकरणी ३२ शेतकरी संघटनांचे एकमत होते. तसेच संघटनांकडून यादव यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, यादव हे भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेल्याने दु:खी नव्हते. मात्र याबाबत आधी शेतकरी संघटनांना कल्पना न दिल्याने माफी मागण्यास तयार आहेत.

हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर पाच दिवसांनी आशिष मिश्रा याला अटक झाली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा एसयूव्हीमध्ये दिसलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमित जयस्वाल याचाही समावेश आहे. तो व्हायरल व्हिडीओमध्ये पळून जाताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीमुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले, अशा प्रकारची तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती. शेतकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत ड्रायव्हर, मित्र आणि भाजपाचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलन