शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 09:26 IST

पाक लष्करप्रमुख जन. असीम मुनीर यांचाच कबुलीनामा, भारताच्या सत्यकथनावर शिक्कामोर्तब

इस्लामाबाद : १९९९च्या कारगिल गेले. युद्धामध्ये पाकिस्तान सहभागी होता याची पाकिस्तानच्या लष्कराने जन. असीम मुनीर पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त रावळपिंडी येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वतः ही कबुली दिली. १९४८, १९६५, १९७१ तसेच १९९९मधील कारगिलच्या युद्धात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, असेही जनरल मुनीर यांनी कबुल केले.

कारगिल भागात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने त्यातील अनेकांचे मृतदेह पाकिस्तानने ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे भारतीय लष्करानेच या सैनिकांच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार केले होते. पाकिस्तानने आपल्या काही सैनिकांचे मृतदेह जाहीरपणे नव्हे तर लपूनछपून ताब्यात घेतल्याच्या बातम्या कारगिल युद्धानंतर झळकल्या होत्या. कारगिल युद्धात आमचा सहभाग नव्हता अशीच भूमिका आजवर पाकिस्तानी लष्कराने घेतली होती. मात्र आता जनरल मुनीर यांनी पाकिस्तानच्या कारगिल युद्ध सहभागाची कबुली दिल्याने भारत यासंदर्भात सत्य सांगत होता हे सिद्ध झाले आहे. नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत ज्या चौक्यांवर पाकिस्तानने कब्जा केला होता.

सैन्य माघारीची क्लिंटन यांची पाकला सूचना

कारगिल येथून आपले लष्कर माघारी बोलविण्याचा आदेश पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी द्यावा, अशी सूचना अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लेिटन यांनी केली होती. तीन महिने चाललेल्या कारगिल युद्धात भारताचे ५४५ जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानविरुद्ध भारताने दिले पुरावे

कारगिल युद्धात पाकिस्तानचे लष्कर सहभागी असल्याचे अनेक पुरावे भारताने दिले होते. पाकिस्तानी सैनिकांची पेबुक, त्यांचे गणवेश, शस्त्रे यांचा त्यात समावेश होता. मात्र भारताने सादर केलेले पुरावे खोटे आहेत असाच कांगावा पाकिस्तान करत राहिला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन