शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 04:18 IST

असंतुष्टांना सामावून घेता यावे यासाठी येडीयुरप्पा यांनी मंत्रिमंडळामधील १६ खात्यांसाठी अद्याप मंत्र्यांची निवड केलेली नाही.

बंगळुरू : कर्नाटकचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले भाजपचे नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी शपथविधीनंतर तब्बल पंचवीस दिवसांनी बनविलेल्या १७ जणांच्या मंत्रिमंडळाबद्दल भाजपमधील असंतुष्टांची नाराजी प्रकट होऊ लागली आहे. मंत्रिमंडळात समावेश केलेल्यांची यादी पाहून वेदना झाल्याचे तसेच आश्चर्यही वाटल्याचे चित्रदुर्ग येथील भाजप आमदार जी. एच. थिप्पा रेड्डी यांनी म्हटले आहे. ते मंत्रीपदासाठी इच्छुक होते.असंतुष्टांना सामावून घेता यावे यासाठी येडीयुरप्पा यांनी मंत्रिमंडळामधील १६ खात्यांसाठी अद्याप मंत्र्यांची निवड केलेली नाही. जनता दल व काँग्रेसच्या १७ बंडखोर आमदारांनी घेतलेल्या पवित्र्यामुळेच कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेले. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकता न आल्याने हे सरकार जाऊन येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केले. १७ बंडखोर आमदारांना कर्नाटक विधानसभेच्या याआधीच्या अध्यक्षांनी अपात्र ठरविले असून, त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट करता येणार नाही हे भाजपने येडीयुरप्पांच्या शपथविधीच्या वेळीच स्पष्ट केले होते. मंत्रीपदाची आस असलेले भाजपमधील आमदारही गप्प बसायला तयार नाहीत. त्या पक्षाचे आमदार जी. एच. थिप्पा रेड्डी यांनी म्हटले आहे की, भाजपमधील निष्ठावान व ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले आहे हे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यासाठी पक्षातील समविचारी आमदार लवकरच एक बैठकही घेणार आहेत. (वृत्तसंस्था)असंतुष्टांच्या समर्थकांचे रास्ता रोकोजी. एच. थिप्पा रेड्डी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी चित्रदुर्ग येथील गांधी चौकात रास्ता रोको आंदोलनही केले. सुलिया मतदारसंघातील भाजपचे आमदार एस. अंगारा हे आजवर सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. आपल्याला मंत्रीपद न दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अंगारा म्हणाले की, मूल्ये पाळून सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना डावलणे हे माझ्या मतदारसंघातील लोकांनाही आवडलेले नाही.आठ वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले उमेश कट्टी, माजी केंद्रीय मंत्री बसवराज पाटील हे येडीयुरप्पा यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अनुपस्थित असणे हेही पुरेसे बोलके होते. कर्नाटकच्या किनारपट्टी भाग तसेच इतर भागांनाही मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी केली आहे.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पा