शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

यंदा ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत दिल्लीच नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ठरविली नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले आणि नवी दिल्लीतून राज्यकारभार हाकत असले, तरी ते स्वत:ला देशाच्या राजधानीत उपरे समजत असावेत की काय, अशी शंका ‘पद्म’ पुरस्कारांच्या नावांतून येत आहे. नवी दिल्लीतील एकाही मान्यवराला यंदा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झालेला नाही.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले आणि नवी दिल्लीतून राज्यकारभार हाकत असले, तरी ते स्वत:ला देशाच्या राजधानीत उपरे समजत असावेत की काय, अशी शंका ‘पद्म’ पुरस्कारांच्या नावांतून येत आहे. नवी दिल्लीतील एकाही मान्यवराला यंदा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झालेला नाही. असे ६४ वर्षांत प्रथमच घडले आहे. केवळ दिल्लीच नव्हे, तर एकूण १२ केंद्रशासित प्रदेश व राज्यांतील एकाही व्यक्तीचे नाव यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत नाही.दक्षिण, पश्चिम व पूर्व भारतातील अनेक मान्यवरांची नावे या वर्षीच्या ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्यातील तब्बल १0 जणांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्या खालोखाल ज्या राज्यात यंदा निवडणूक आहे, त्या कर्नाटकातील ८ जण यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.ज्या तामिळनाडूमध्ये भाजपा पाय रोवू इच्छित आहे, तेथील ६ जण आणि केरळमधील ४ जण या यादीत आहेत. पश्चिम बंगालमधील ५ आणि ओडिशामधील चार जणांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.बिहार व झारखंडमधील प्रत्येकी तिघे या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या वर्षी तब्बल १६ परदेशी व्यक्तींना हे पुरस्कार देण्याचे जाहीर झाले आहेत. त्यापैकी १0 जण तर आशिअन देशांतील आहेत. या देशांच्या प्रमुखांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. अमेरिका व रशियातील प्रत्येकी एका व्यक्तीची ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी या वर्षी निवड करण्यात आली आहे. याखेरीज नेपाळ, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान व व्हिएतनाममधील प्रत्येकी एक जण ‘पद्म’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.शिफारशी नाकारल्यानरेंद्र मोदी यांनी यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारासाठीच्या नावांमध्ये बारीक लक्ष घातले होते. त्यामुळेच रा. स्व. संघाशी संबंधित पी. परमेश्वरन आणि डॉ. व्ही. पी. नंदा यांची निवड करण्यात आली. शिवाय योगा, आध्यात्म व पारंपरिक वैद्यकशास्त्र यांतील ६ जणांचा पद्मच्या यादीत समावेश करण्यात आला. यापूर्वी ‘पद्म’ पुरस्कारांसाठी निवड करताना राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सत्ताधारी पक्षाचे नेते यांच्या शिफारशींच्या नावांचा विचार केला जात असे. यंदा मात्र तुम्ही कोणाच्याही नावाची शिफारस करू नका, असे खासगीत सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुचविलेल्या नावांचाही विचार केला नव्हता, हे सर्वज्ञात आहे. यंदा गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या शिफारशी अमान्य करण्यात आल्या, असे समजते.

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी