शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राँग नंबरवालं प्रेम! सीमा-अंजूनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या गुलजारची लव्हस्टोरी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:08 IST

पाकिस्तानमधील एका व्यक्तीचं नांदयाल येथील एका महिलेशी राँग नंबरवर बोलणं सुरू झालं. यानंतर दोघे प्रेमात पडले.

आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात महिला आणि तिच्या पाकिस्तानी प्रियकराची लव्हस्टोरी समोर आली आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीचं नांदयाल येथील एका महिलेशी राँग नंबरवर बोलणं सुरू झालं. यानंतर दोघे प्रेमात पडले. महिलेचा प्रियकर दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतात आला आणि लग्न करून एकत्र राहू लागला. यानंतर त्याला बनावट आधार कार्ड आणि पासपोर्ट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

सध्या पाकिस्तानची महिला सीमा हैदर आणि भारताची अंजू यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. याच दरम्यान, आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेल्या दौलत बी आणि तिच्या पाकिस्तानी प्रियकराची लव्हस्टोरी समोर आली आहे. दौलत बी सध्या तिच्या आई-वडिलांसोबत गदिवेमुला मंडलमध्ये राहत आहे. दौलत बी हिच्या पतीचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंब चालवण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले.

2010 मध्ये दौलत बीला एका चुकीच्या नंबरवरून कॉल आला. दौलतला कॉल रिसिव्ह करता आला नाही. यानंतर फोन परत केला असता पाकिस्तानमधील गुलजार नावाच्या व्यक्तीने तो रिसीव्ह केला. दोघांनी एकमेकांबद्दल विचारले आणि ओळख झाली. हळूहळू दोघेही प्रेमात पडले. गुलजार आपल्या प्रेमासाठी दुबईमार्गे भारतात आला होता. येथे आल्यानंतर दौलत बीने गुलजारबद्दल तिच्या घरच्यांना सांगितले आणि लग्न करण्याबाबत बोलली. दौलत बीच्या सांगण्यावरून घरच्यांनी होकार दिला आणि दोघांनी लग्न केलं.

गुलजार आणि दौलत बी यांचे वैवाहिक आयुष्य दहा वर्षे सुरळीत चालले. गुलजार आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात चित्रकलेचे काम करतात. तर दौलत बी मजूर म्हणून काम करते. दौलतला चार मुले आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र राहत आहे. भारतात राहत असताना पाकिस्तानच्या गुलजार यांना दहा वर्षांत भारताचे आधार कार्ड मिळाले. कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्टही बनवण्यात आले. यानंतर गुलजार आपल्या देश पाकिस्तानला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

तपासादरम्यान गुलजार पाकिस्तानी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. गुलजार याच्यावर पासपोर्ट कायदा, बनावट कागदपत्रे आणि फसवणूक यासह इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल आज म्हणजेच 27 जुलै रोजी सुनावण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान