शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'अर्थव्यवस्थेचा पाया ढासळलाय, आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये भारत 27 वरुन 53 व्या स्थानवर'

By महेश गलांडे | Updated: February 3, 2021 15:14 IST

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय.

मुंबई - कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली असून कित्येकांना आपले रोजगारही गमावावे लागले आहेत. नुकतेच, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प 2021 सादर केला. त्यामध्ये, इन्फास्ट्रक्चर डेव्हलमेंटसह विविध योजनांना प्राधान्य देण्यात आलं आहे. देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तर, विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, संरक्षण खात्याचं बजेट आणखी का वाढवलं नाही, असा सवालही उपस्थित केला होता.   

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय. एकीकडे अर्थव्यवस्थेची घसरण आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नसल्यानेच नान पटोले यांनी मोदी सरकार लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. ''देशाला महासत्ता बनविण्याचं स्वप्न दाखवून मोदी सरकारने गेल्या 6 वर्षांत देशाला कुठल्या रस्त्यावर आणून सोडलंय. आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये आपला देश 2020 मध्ये 27 व्या स्थानावरुन 53 व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. याचाच अर्थ, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आणि लोकशाही मोडकळीस आलीय,'' असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. 

जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, ज्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा तडाखा बसला आहे त्यामध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सनुसार, कोरोनाचा सगळ्यांत मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. वादाचा, चर्चेचा मुद्दा हा नाही की कोरोनामुळे ज्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे त्यामध्ये भारत पहिल्या की दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची एवढी दुर्दशा झाली कशी? अर्थव्यवस्था एवढी रसातळाला कशी गेली?. तर, कोरोनाचं संकट आणि त्यामुळे प्रदीर्घ काळ लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर घाबरून आर्थिक घडामोडी स्थगित झाल्याने अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोलेEconomyअर्थव्यवस्था