शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'अर्थव्यवस्थेचा पाया ढासळलाय, आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये भारत 27 वरुन 53 व्या स्थानवर'

By महेश गलांडे | Updated: February 3, 2021 15:14 IST

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय.

मुंबई - कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली असून कित्येकांना आपले रोजगारही गमावावे लागले आहेत. नुकतेच, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प 2021 सादर केला. त्यामध्ये, इन्फास्ट्रक्चर डेव्हलमेंटसह विविध योजनांना प्राधान्य देण्यात आलं आहे. देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तर, विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, संरक्षण खात्याचं बजेट आणखी का वाढवलं नाही, असा सवालही उपस्थित केला होता.   

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय. एकीकडे अर्थव्यवस्थेची घसरण आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नसल्यानेच नान पटोले यांनी मोदी सरकार लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. ''देशाला महासत्ता बनविण्याचं स्वप्न दाखवून मोदी सरकारने गेल्या 6 वर्षांत देशाला कुठल्या रस्त्यावर आणून सोडलंय. आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये आपला देश 2020 मध्ये 27 व्या स्थानावरुन 53 व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. याचाच अर्थ, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आणि लोकशाही मोडकळीस आलीय,'' असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. 

जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, ज्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा तडाखा बसला आहे त्यामध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सनुसार, कोरोनाचा सगळ्यांत मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. वादाचा, चर्चेचा मुद्दा हा नाही की कोरोनामुळे ज्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे त्यामध्ये भारत पहिल्या की दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची एवढी दुर्दशा झाली कशी? अर्थव्यवस्था एवढी रसातळाला कशी गेली?. तर, कोरोनाचं संकट आणि त्यामुळे प्रदीर्घ काळ लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर घाबरून आर्थिक घडामोडी स्थगित झाल्याने अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोलेEconomyअर्थव्यवस्था