शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 09:48 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मायावतींनी काँग्रेस आणि भाजपा एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला मत देणं म्हणजे आपलं मत बरबाद करण्यासारखं आहे. काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या भाजपाला फायदा पोहोचवत असल्याचा आरोप मायावतींनी केला होता. त्यावर प्रियंका गांधी म्हणाले, भाजपाला फायदा पोहोचवण्याऐवजी मी मरणं पसंत करेन, मी कधीही अशा जहाल आणि विध्वंसक विचारधारेशी समझोता करणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवारांना भाजपाची मतं मिळत असल्याचंही प्रियंका गांधींनी सांगितलं आहे. कालच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप युती करून उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप मायवाती यांनी केला होता. एक सभेत त्या बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली. भाजपाने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपाने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला होता. तसेच बसपा आणि सपा युतीसंदर्भात काँग्रेसकडून देखील वाटेल ते वक्तव्य करण्यात येत आहे.

यावरून काँग्रेस आणि भाजपने आपापसात युती केल्याची उघड होते, असंही मायावती यांनी म्हटले होते. त्यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशात काँग्रेसने मजबूत उमेदवारी दिले आहेत. सगळेच उमेदवार जिंकतील, काही जिंकू शकले नाही, तरी ते भाजपला नुकसान करतील, असंही प्रियंका यांनी सांगितले होते. यावर मायवती म्हणाल्या की, काँग्रेसचे अधिकाअधिक उमेदवार भाजपाला फायदा पोहोचविण्यासाठीच आहे. तर सप-बसपचं रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असल्याचे बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावती