शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 09:48 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मायावतींनी काँग्रेस आणि भाजपा एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला मत देणं म्हणजे आपलं मत बरबाद करण्यासारखं आहे. काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या भाजपाला फायदा पोहोचवत असल्याचा आरोप मायावतींनी केला होता. त्यावर प्रियंका गांधी म्हणाले, भाजपाला फायदा पोहोचवण्याऐवजी मी मरणं पसंत करेन, मी कधीही अशा जहाल आणि विध्वंसक विचारधारेशी समझोता करणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवारांना भाजपाची मतं मिळत असल्याचंही प्रियंका गांधींनी सांगितलं आहे. कालच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप युती करून उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप मायवाती यांनी केला होता. एक सभेत त्या बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली. भाजपाने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपाने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला होता. तसेच बसपा आणि सपा युतीसंदर्भात काँग्रेसकडून देखील वाटेल ते वक्तव्य करण्यात येत आहे.

यावरून काँग्रेस आणि भाजपने आपापसात युती केल्याची उघड होते, असंही मायावती यांनी म्हटले होते. त्यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशात काँग्रेसने मजबूत उमेदवारी दिले आहेत. सगळेच उमेदवार जिंकतील, काही जिंकू शकले नाही, तरी ते भाजपला नुकसान करतील, असंही प्रियंका यांनी सांगितले होते. यावर मायवती म्हणाल्या की, काँग्रेसचे अधिकाअधिक उमेदवार भाजपाला फायदा पोहोचविण्यासाठीच आहे. तर सप-बसपचं रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असल्याचे बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावती