शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

चिंताजनक! माध्यमस्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारताची घसरण, 180 देशांमध्ये मिळाले 140 वे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:52 IST

भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माध्यमस्वातंत्र्य असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून, 180 देशांमध्ये भारताला 140 वे स्थान मिळाले आहे. तसेच निवडणूक प्रचारासा काळ हा भारतातील पत्रकारांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 म्हणजेच जागतिक माध्यमस्वातंत्र क्रमवारी 2019 मध्ये नॉर्वेने अव्वलस्थान पटकावले आहे. जगभरात पत्रकारांबाबत द्वेशाची भावना वाढत चालली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी किमान सहा पत्रकारांची हत्या केली गेली. भारतात पत्रकारांसोबत होणाऱ्या हिंसेमध्ये पोलिसांकडून होणारी हिंसा, नक्षलवाद्यांकडून होणारी हिंसा, गुन्हेगारी समूह आणि राजकारण्यांकडून घेण्यात येणाऱ्या बदल्याचा समावेश आहे.  रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्स ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संघटना आहे. या संस्थेकडून जगभरात पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचे एकत्रिकरण करण्याचे काम केले जाते. पत्रकारांबाबत असलेल्या द्वेषाचे हिंसेत रूपांतर होत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण वाढले आहे, असे 2019 ची क्रमवारी तयार करताना  रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सच्या निदर्शनास आले आहे.  भारतात हिंदुत्वाविरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांविरोधात सोशल मीडियावर चालवण्यात येणाऱ्या द्वेषकारक अभियानांबाबत या अहवालांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. तसेच मी टू अभियानामधून महिला वार्ताहरांच्या लैंगिक शोषणाबाबत समोर आलेल्या घटनांचाही यात उल्लेख आहे. दक्षिण आशियाचा विचार केल्यास माध्यम स्वातंत्र्याच्या क्रमवारीत स्थान मिळालेल्या 180 देशांच्या यादीत भारत 140 व्या, पाकिस्तान 142 व्या, बांगलादेश 150 व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत नॉर्वे प्रथम तर फिनलँड दुसऱ्या स्थानी आहे.   

टॅग्स :Mediaमाध्यमेInternationalआंतरराष्ट्रीय