शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चिंताजनक! माध्यमस्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारताची घसरण, 180 देशांमध्ये मिळाले 140 वे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:52 IST

भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतात प्रसारमाध्यमांची गळचेपी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माध्यमस्वातंत्र्य असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून, 180 देशांमध्ये भारताला 140 वे स्थान मिळाले आहे. तसेच निवडणूक प्रचारासा काळ हा भारतातील पत्रकारांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 म्हणजेच जागतिक माध्यमस्वातंत्र क्रमवारी 2019 मध्ये नॉर्वेने अव्वलस्थान पटकावले आहे. जगभरात पत्रकारांबाबत द्वेशाची भावना वाढत चालली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी किमान सहा पत्रकारांची हत्या केली गेली. भारतात पत्रकारांसोबत होणाऱ्या हिंसेमध्ये पोलिसांकडून होणारी हिंसा, नक्षलवाद्यांकडून होणारी हिंसा, गुन्हेगारी समूह आणि राजकारण्यांकडून घेण्यात येणाऱ्या बदल्याचा समावेश आहे.  रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्स ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संघटना आहे. या संस्थेकडून जगभरात पत्रकारांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचे एकत्रिकरण करण्याचे काम केले जाते. पत्रकारांबाबत असलेल्या द्वेषाचे हिंसेत रूपांतर होत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण वाढले आहे, असे 2019 ची क्रमवारी तयार करताना  रिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सच्या निदर्शनास आले आहे.  भारतात हिंदुत्वाविरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांविरोधात सोशल मीडियावर चालवण्यात येणाऱ्या द्वेषकारक अभियानांबाबत या अहवालांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. तसेच मी टू अभियानामधून महिला वार्ताहरांच्या लैंगिक शोषणाबाबत समोर आलेल्या घटनांचाही यात उल्लेख आहे. दक्षिण आशियाचा विचार केल्यास माध्यम स्वातंत्र्याच्या क्रमवारीत स्थान मिळालेल्या 180 देशांच्या यादीत भारत 140 व्या, पाकिस्तान 142 व्या, बांगलादेश 150 व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत नॉर्वे प्रथम तर फिनलँड दुसऱ्या स्थानी आहे.   

टॅग्स :Mediaमाध्यमेInternationalआंतरराष्ट्रीय