शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

श्रीमंतांचा गरीब देश; देशातील एकूण संपत्तीचा निम्मा वाटा अवघ्या 1 टक्के लोकांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 10:44 IST

ऑक्सफॅमच्या अहवालातून गरीब-श्रीमंतांमधील वाढती दरी पुन्हा एकदा अधोरेखित

नवी दिल्ली: गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी वाढतच चालल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतातील 10 टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के इतकी संपत्ती आहे. या 10 टक्क्यांपैकी 1 टक्का मंडळी इतकी श्रीमंत आहेत की, त्यांच्याकडे देशातील एकूण संपत्तीच्या 51.53 टक्के इतकी संपत्ती आहे. तर 60 टक्के लोकसंख्येकडे केवळ 4.8 टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. दाओसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पूर्वी ऑक्सफॅमचा अहवाल जाहीर होतो. 2018 ते 2022 या काळात भारतातील श्रीमंतांच्या संख्येत प्रत्येक दिवशी 70 जणांची वाढ होईल, असा अंदाज ऑक्सफॅमनं वर्तवला आहे. 2018 मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या 18 नं वाढली. सध्या देशातील अब्जाधीशांची संख्या 119 इतकी आहे. त्यांच्याकडे तब्बल 28 लाख कोटींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे देशातील सध्याच्या कोट्याधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये प्रत्येक दिवसाकाठी 2200 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील 1 टक्का लोकांची संपत्ती गेल्या वर्षभरात 39 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील केवळ 9 टक्के श्रीमंत लोकांकडे असलेली संपत्ती आणि 50 टक्के गरीब लोकांकडे असलेली संपत्ती जवळपास सारखीच आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची आर्थिक प्रगती अतिशय संथगतीनं झाली आहे. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या संपत्ती वाढीचा वेग केवळ तीन टक्के इतका आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारी विचारात घेतल्यास कोट्याधीशांच्या संपत्तीत दर दिवशी 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.  

टॅग्स :Indiaभारत