शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांचा गरीब देश; देशातील एकूण संपत्तीचा निम्मा वाटा अवघ्या 1 टक्के लोकांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 10:44 IST

ऑक्सफॅमच्या अहवालातून गरीब-श्रीमंतांमधील वाढती दरी पुन्हा एकदा अधोरेखित

नवी दिल्ली: गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी वाढतच चालल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भारतातील 10 टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के इतकी संपत्ती आहे. या 10 टक्क्यांपैकी 1 टक्का मंडळी इतकी श्रीमंत आहेत की, त्यांच्याकडे देशातील एकूण संपत्तीच्या 51.53 टक्के इतकी संपत्ती आहे. तर 60 टक्के लोकसंख्येकडे केवळ 4.8 टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. दाओसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पूर्वी ऑक्सफॅमचा अहवाल जाहीर होतो. 2018 ते 2022 या काळात भारतातील श्रीमंतांच्या संख्येत प्रत्येक दिवशी 70 जणांची वाढ होईल, असा अंदाज ऑक्सफॅमनं वर्तवला आहे. 2018 मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या 18 नं वाढली. सध्या देशातील अब्जाधीशांची संख्या 119 इतकी आहे. त्यांच्याकडे तब्बल 28 लाख कोटींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे देशातील सध्याच्या कोट्याधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये प्रत्येक दिवसाकाठी 2200 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील 1 टक्का लोकांची संपत्ती गेल्या वर्षभरात 39 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील केवळ 9 टक्के श्रीमंत लोकांकडे असलेली संपत्ती आणि 50 टक्के गरीब लोकांकडे असलेली संपत्ती जवळपास सारखीच आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची आर्थिक प्रगती अतिशय संथगतीनं झाली आहे. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या संपत्ती वाढीचा वेग केवळ तीन टक्के इतका आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारी विचारात घेतल्यास कोट्याधीशांच्या संपत्तीत दर दिवशी 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.  

टॅग्स :Indiaभारत