शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

यंदाच्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.3% वेगानं वाढणार- वर्ल्ड बँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 09:19 IST

2019 आणि 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग 7.5% असेल असा अंदाज

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा 7.3 टक्के इतका राहिल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या परिणामांमधून बाहेर पडली असल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. याशिवाय 2019 आणि 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगानं वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. जागतिक बँकेकडून वर्षातून दोनदा 'साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट' प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग 6.7 टक्क्यांवरुन 7.3 टक्क्यांवरुन जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल. याशिवाय खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदेखील चांगली राहिल, असा अंदाज आहे. जागतिक स्तरावर आर्थिक स्तरावर मुसंडी मारायची असल्यास, भारतानं गुंतवणूक आणि निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं जागतिक बँकेचा अहवाल सांगतो. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. मात्र या परिणामांमधून अर्थव्यवस्था सावरत असल्याचं जागतिक बँकेनं अहवालात नमूद केलं आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा फटका भारतातील गरिबांना बसल्याचा उल्लेखदेखील अहवालात करण्यात आला आहे.  

टॅग्स :World Bankवर्ल्ड बँक