शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:36 IST

काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये जेडीएस काँग्रेसची सत्ता असताना नेहमी कुमारस्वामी मनातील सल कार्यकर्त्यांसमोर बोलत असत. एका सभेत तर ते रडले होते. आता सत्ता गेल्यानंतर काँग्रेसचे नेते कुमारस्वामींना दोष देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निगम अध्यक्षांसह सर्व आमदारांना पूर्ण स्वातंत्र्यही दिल्याचे कुमारस्वामींनी म्हटले आहे. 

गेल्या महिन्यात कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारचा पाडाव झाला. जवळपास 15 ते 20 दिवस हे सत्तापालटाचे नाटक सुरु होते. काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामा देत मुंबई गाठली होती. याला भाजपाच्या नेत्यांची फूस होती असा आरोप काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी केला होता. हे आमदार खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहत मुंबई पोलिसांना जीवाला धोका असल्याचे पत्र दिले होते. यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरविली होती. यानंतर काँग्रेसचे डी के शिवकुमार या नाराज आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास दिले नाही. त्यांना रिकाम्या हातांनी माघारी फिरावे लागले होते. 

कुमारस्वामी आणि त्यांचा भाऊ यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत या आमदारांनी बंड केले होते. यामुळे व्यथित झालेल्या कुमारस्वामी यांनी सोमवारी एका सभेत भावना व्यक्त केल्या. आपण काँग्रेससाठी गेली 14 वर्षे गुलामासारखे काम केल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने वरिष्ठ पातळीवरील नेते माझ्यासोबत इमानदारीने जेडीएससोबत हात मिळून पाहत होते. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांना हे नको होते, असे कुमारस्वामींनी सांगितले. 

काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली. जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी जास्त निधी दिला. काही आमदार पूर्वसूचना न देता भेटण्यासाठी येत होते. त्यांना कधी नकार दिला नाही. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक समस्या सोडविली. मी 14 महिन्यांत जेवढे काम केले तेवढे गेल्या काँग्रेस सरकारनेही केले नाही. या काळात काँग्रेसच्या आमदार क्षेत्रासाठी मी 19 हजार कोटी रुपये निधी दिल्याचे कुमारस्वामींनी सांगितले. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatak Politicsकर्नाटक राजकारण