शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बोदवड उपसाचे काम सुरू करण्यास मान्यता २१७८.६७ किंमतीचे काम: दोन टप्प्यात ५३ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ

By admin | Updated: January 3, 2017 19:24 IST

जळगाव : जिल्‘ातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या २१७८.६७ कोटी खर्चाच्या कामास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. तब्बल सहा वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचे भुमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या प्रकल्पासाठी५०० कोटींचा निधी केंद्राकडून राज्यास प्राप्त झाल्यानंतरही केवळ शासन मान्यतेअभावी काम सुरू करण्यात अडचणी येत होत्या.

जळगाव : जिल्‘ातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या २१७८.६७ कोटी खर्चाच्या कामास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. तब्बल सहा वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचे भुमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या प्रकल्पासाठी५०० कोटींचा निधी केंद्राकडून राज्यास प्राप्त झाल्यानंतरही केवळ शासन मान्यतेअभावी काम सुरू करण्यात अडचणी येत होत्या.
हतनूर धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर गावाजवळील खामखेडा पुलाजवळ पूर्णा नदीच्या काठावरून पंपाव्दारे १९८.५४ पाणी उचलून ते जुनोरे व जामठी धरणापर्यंत नेणे या योजनेत प्रस्तावित होते.
वेळोवेळी सुधारीत मान्यता
हा प्रकल्प व्हावा म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रयत्न करून त्यांच्याच हस्ते ११ जून २०११ रोजी या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा झाला होता. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्पात समावेश केला जावा म्हणूनही केंद्राकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रकल्प रेंगाळत गेल्याने त्याची किंमतही वाढत गेली. त्यानुसार १९९९ मध्ये प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. तर २००९-१० दरसुचीवर आधारीत योजनेची अद्ययावत किंमत २१७८.६७ कोटीची मान्यताही मिळाली आहे. २०१० रोजी प्रकल्पास पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली. तसेच प्रकल्पासाठी लागणार्‍या ५०७.३१ हेक्टर वनजमिनीच्या हस्तांतरणासही केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्राकडून ५०० कोटी
योजनेचा खर्च दोन हजार कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे कामास प्रारंभ करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक होती. त्यासाठी २०११ व २०१२ मध्ये दोनता राज्य शासनास सादर करण्यात आला होता. तब्बल पाच वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेची या कामास प्रतिक्षा करावी लागली. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या कामासासाठी केंद्र शासनाकडून विशेष सहाय्य मंजूर होऊन ५०० कोटींचा निधी केंद्राकडून राज्यास प्राप्त झाला आहे. त्यानंतर केंद्र शासनाकडूनच या प्रकल्पासाठी २०१४-१५ मध्ये ६६.६६ कोटींचा निधीदेखील वितरीत झालेला आहे.
नव्या सरकारकडून अपेक्षा
रेंगाळलेल्या या प्रकल्पास राज्यातील युतीच्या सरकारकडून मान्यता मिळावी अशी अपेक्षा केली जात होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर मंगळवारी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत २१७८.६७ कोटी किंमतीचे काम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.