शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ना वर्क फ्रॉम होम.. ना ऑनलाइन क्लास..; दिल्लीत इंटरनेट बंदीचा नाहक त्रास

By देवेश फडके | Updated: January 27, 2021 14:12 IST

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील इंटरनेट बंदीचा पाच कोटी नागरिकांवर परिणामवर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लास, पेमेंट्सवर मोठा प्रभावकृषी कायद्याविरोधात काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर इंटरनेट बंदीचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारानंतर दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दिल्लीत टॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर लगेचच मोबाइल इंटरनेट बंदीचे निर्देश देण्यात आले. कोरोना संकटामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच ऑनलाइन क्लास असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या अनेकविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. 

ऑनलाइन क्लास रद्द

पश्चिम दिल्ली भागातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद असल्यामुळे ऑनलाइन क्लास रद्द करण्यात आले. केवळ घरून काम करणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाच इंटरनेट बंदीचा फटका बसला असे नाही, तर यामुळे सामान्य कामकाजही विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर इंटरनेट बंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. 

इंटरनेट बंदीचा पाच कोटी नागरिकांना फटका

इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक ठिकाणचे सामान्य जनजीवनही विस्कळीत झाले आहे. यामुळे दिल्लीत गेलेल्या प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. तसेच या प्रकरणी २०० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचारानंतर पोलिसांनी २२ एफआयआर नोंदवल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र