शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खट्टर म्हणाले, प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 04:16 IST

प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात. अशी ८० ते ९० टक्के प्रकरणे ओळखीच्या लोकांमधील विसंवादातूनच घडतात, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.

चंदीगड : प्रियकराशी बिनसल्यावर मुली बलात्काराची तक्रार करतात. अशी ८० ते ९० टक्के प्रकरणे ओळखीच्या लोकांमधील विसंवादातूनच घडतात, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. त्याचा व्हिडिओ शनिवारी झळकल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर रविवारीसुद्धा खट्टर यांनी आपल्या विधानांचे समर्थनच केले.खट्टर म्हणाले, प्रियकर व प्रेयसी बराच काळ एकत्र फिरतात. मात्र, जेव्हा खटके उडू लागतात, एकमेकांशी पटेनासे होते त्यावेळी चित्र वेगळे असते. प्रियकराने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार प्रेयसी पोलिसांकडे दाखल करते.ते म्हणाले की, सहमतीतून बलात्काराची प्रकरणे असे मी कुठेही म्हटलेले नाही. बलात्काराच्या सर्वाधिक तक्रारी ओळखीच्या लोकांकडूनच केल्या जातात. हे माझे मत नाही, तर पोलिसांनीच तसा अहवाल दिला आहे. या समस्येकडे सामाजिक अंगाने पाहावयास हवे. हरियाणातील गुरगाव, फरिदाबाद येथे २०१६ मध्ये बलात्काराच्या १,१८७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत म्हटले आहे. त्यात बलात्काराची ९९६ व सामूहिक बलात्काराची १९१ प्रकरणे आहेत. २०१४ मध्ये महिला अत्याचाराची ९,०१०, २०१५ मध्ये ९,५११, २०१६ मध्ये ९,८३९ प्रकरणे नोंदविण्यात आली.काँग्रेस व केजरीवाल यांनी केला तीव्र निषेधखट्टर यांनी केलेले वक्तव्य महिलांविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. टष्ट्वीटवर त्यांनी म्हटले की, खट्टर यांनी केलेला दावा निंदनीय आहे. या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. खट्टर हे बलात्कार प्रकरणांचे समर्थन करीत असल्याचा प्रहार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले, एखाद्या मुख्यमंत्र्याचीच अशी मानसिकता असेल, तर तेथील महिला सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा कशी करता येईल.

टॅग्स :Haryanaहरयाणा