शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

महिलाच कापतायेत स्वतःची वेणी? पोलिसांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 08:55 IST

सध्या सुरू असलेल्या तपासातून पोलिसांनी दोन मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

ठळक मुद्देदिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांची वेळी कापण्याच्या घटना घडत आहेत. सध्या सुरू असलेल्या तपासातून पोलिसांनी दोन मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.एकतर ती महिलाच स्वतःची वेळी कापत असावी किंवा तिच्या घरातील सदस्य वेणी कापण्याचा हा प्रकार करत असावे, असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली, दि. 4- दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांची वेळी कापण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे अगदी सगळेच जण चिंतेत आहे. आत्तापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये एकही प्रकरण असं नाही ज्यामध्ये पीडित मुलीने वेणी कापणाऱ्याचा चेहरा पाहिला. यामुळे पोलिसांनाही तपास करण्यात अडथळे येत आहेत. पण सध्या सुरू असलेल्या तपासातून पोलिसांनी दोन मुद्द्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. एकतर ती महिलाच स्वतःची वेळी कापत असावी किंवा तिच्या घरातील सदस्य वेणी कापण्याचा हा प्रकार करत असावे, असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या मते,आजपर्यंत जितक्या वेणी कापण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे. सगळ्याच महिलांची वेणी त्या घरात असताना कापली गेली आहे. जास्त केसेसमध्ये घराचा मुख्य दरवाजा बंद असतानाही वेणी कापल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा आहेत, पण त्या कॅमेऱ्यामध्ये कोणताही संशयित व्यक्ती दिसत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

पोलिसांनी महिलांची वेणी कापण्याच्या या घटनांबद्दल त्यांच्या सुत्रांकडूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या मागे कोणी बाहेरचा व्यक्ती किंवा टोळी काम करते आहे का ? याची माहिती पोलिसांनी सुत्रांकडून मिळविण्याचा प्रयत्न केला, पण आत्तापर्यंतच्या चौकशीत सुत्रांनाही याबद्दल माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे दिल्लीच्या कांगनहेडीमधील तीन घटना आणि पालम साधनगरमधील एका घटनेबद्दल फॉरेन्सिक एक्सपर्टने ऑफ द रिकॉर्ड सांगितलं, या चार घटनांपैकी दोघांमध्ये वेणी कापण्यासाठी कात्रीचा वापर झाला होता. तर इतर दोन घटनांबद्दलचा निष्कर्ष अजून निघाला नाही. पोलिसांच्या मते, महिलांची वेणी कापण्याच्या घटनांमध्ये जर तंत्र विद्येचा वापर केला गेला असता तर त्याचे इतर दुष्पपरिणाम पण दिसले असते त्यामुळे तंत्र विद्येतून हे होत असल्याचं लोकांचं मत हा फक्त भ्रम आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,पीडित महिला तणावातून जात असावी, त्या तणावात स्वतःची वेणी कापू शकतात. 

पोलिसांना आलेल्या संशयानंतरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर महिलांनी स्वतःची वेणी कापली असेल तर घटनास्थळी कात्री किंवा इतर वस्तू सापडली असत्या. नाहीतर घरातील कात्रीला केस लागलेले दिसले असते. महिला मनोरूग्ण असेल हे मानसोपचारतज्ज्ञांचं मत ऐकलं, तर स्वतःची वेणी कापून ती महिला कात्री साफ करून ठेवते का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

नेमकं प्रकरण काय ?दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये घडताना दिसून येत आहे. येथील महिलांनी असा दावा केला आहे की, अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर. उत्तरप्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम...काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेण्या घालणंच दिले सोडून...केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेण्या घालणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.